महाराष्ट्रात चाललंय काय? तब्बल 1,300 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं; धक्कादायक अहवाल समोर…

Spread the love

दुष्काळ, नापिकी, अवकाळी अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करून थकलेल्या एक हजार ३७० शेतकऱ्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोलापूर : दुष्काळ, नापिकी, अवकाळी अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करून थकलेल्या एक हजार ३७० शेतकऱ्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीनुसार जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या १५ महिन्यांत तब्बल साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात, अशी मागील काही वर्षांची स्थिती आहे.

अमरावती व छत्रपती संभाजीनगर येथे हे प्रमाण जास्त आहे.यंदा ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून एक हजार ३७० शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page