राजेश सावंत यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर आमच्या मित्रपरिवाराचे ही मोठे नुकसान – ना. उदय सामंत…

Spread the love

रत्नागिरी (वार्ताहर): भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या निधना बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री उदय सामंत भावूक झाले. राजेश सावंत यांच्या निधना नेत्यांच्या कुटुंबाचेच नव्हेतर आमच्या मित्र परिवाराचेही मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. राजेश सावंत यांच्याशी असलेली अनेक वर्षांची मैत्री, राजकीय प्रवासातील सहवास आणि वैयक्तिक जिव्हाळ्याच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.

मंत्री उदय सामंत म्हणालेकी, राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक असले तरी राजेश सावंतआणि त्यांच्यातील मैत्रीक कधीही कमी झाली नाही. आम्ही कॉलेजपासून एकत्र होतो. त्यानंतर क्रिकेटही एकत्र खेळलो आणि गेली २० ते २२ वर्षे राजकारणातही एकत्र काम केले.राजकीय मतभेद झाले, परंतु आमच्या वैयक्तिक नात्यात कधी कटुता आली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.राजेश सावंत यांच्या निधनानेत्यांच्या कुटुंबीयांचे नुकसान तरझालेच आहे, मात्र मित्र परिवाराला ही मोठा धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले. *“हे केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही, तर आमच्या मित्र परिवाराचे ही मोठे नुकसान आहे, “* अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी त्यांनी अलीकडे प्रसारित झालेल्या एका ऑडिओ
क्लिपचा ही उल्लेख केला. राजेश सावंत यांच्या निधनाच्या अवघ्या चोवीस तास आधी त्यांच्याशी दूरध्वनीवर संवाद झाल्याचे सांगत, त्या संभाषणात सावंत यांनी आपल्या समर्थनार्थ भूमिका मांडल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. *“हीच आमच्या मैत्रीची खरी ओळख होती,”* असे ते म्हणाले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page