ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात खोपोली, कसारा, कर्जत, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, बदलापूरच्या दिशेने येणाऱ्या लोकल प्रवाशांनी खच्चून भरुन येतात. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना लोकल डब्यात चढणे शक्य होत नाही. धक्काबुक्की करत डब्यात प्रवेश मिळविण्यासाठी बहुतांशी प्रवासी रेल्वे मार्गात उभे राहून उलट दरवाजातून लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी या रेल्वे मार्गावरुन फलाट क्रमांक ३ वरून लोकल, एक्सप्रेस आली तर अपघात होण्याची शक्यता प्रवाशांकडून तसेच प्रवाशी संघटनेकडून वर्तविली जात आहे.
सकाळी साडे सात ते साडे आठ वाजेपर्यंत दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून हा प्रकार सुरू आहे. यापूर्वी काही ठराविक प्रवासी उलट दिशेने डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होते. आता बहुतांशी प्रवासी फलाट क्रमांक २वरुन डब्यात चढणे शक्य होत नसल्याने रेल्वे मार्गात उभे राहून उलट दिशेच्या दरवाजातून लोकलमध्ये चढतात. आपत्कालीन पायऱ्यांचा सुद्धा वापर ते डब्यात चढण्यासाठी करतात.
सकाळच्या वेळेत दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. या गर्दीच्या वेळेत दिवा रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस व रेल्वे सुरक्षा रक्षक जवान तैनात नसतात. त्याचा गैरफायदा काही प्रवासी घेत असताना दिसुन वारंवार दिसुन येत आहे. रेल्वे मार्गात उभे असताना अचानक बाजुच्या रेल्वे मार्गावरुन लोकल, एक्सप्रेस आली तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना उलट दिशेच्या दरवाजातून डब्यात चढून दिले नाही तर ते दादागिरी करुन डब्यात चढून विरोध करणाऱ्या प्रवाशाला संघटितपणे गप्प बसवितात. त्यामुळे या विषयावर डब्यातील कोणीही प्रवासी या प्रकाराला विरोध करण्यास तयार होत नाही. उलट दिशेच्या दरवाजात दाटी-वाटीने उभ्या असलेल्या प्रवाशांना दिव्यातील प्रवाशांचा त्रास होतो. त्यांना काही बोलण्याची सोय नसते, असे प्रवाशांनी सांगितले.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात