बाळ माने ना कोणत्याही परिस्थिती मध्ये हरवा त्यांनी भाजप शी गद्दारी केली आहे.- भाजप नेते मंत्री रवींद्र चव्हाण …

Spread the love

मंत्री उदय सामंत यांनी आज महायुती चे नेते रवींद्र चव्हाण याच्या उपस्थित मध्ये उमेदवारी अर्ज भरला.

*रत्नागिरी/ प्रतिनिधी-* हा अर्ज भरण्यापूर्वी  महायुती च्या कार्यकर्त्यांची बैठक स्वयंवर या ठिकाणी झाली. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी, किरण सामंत, भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत,जिल्हा प्रमुख राहुल पंडित, बाबा परुळेकर, दीपक पटवर्धन, बिपीन बंदरकर सह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की बाळ माने यांना बांधकाम मंत्री असताना सगळ्यात जास्त निधी दिला. त्या बाळ माने ना कायम उजव माप दिल. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्या बाळ माने ना या निवडणुकीच्या  रणांगणात हरवलं पाहिजे असा आदेश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या रीतीने रुजली पाहिजे म्हणून  महाराष्ट्राचे युवाचा अध्यक्ष पद कोणाला दिला तर बाळ माने ना दिल.


जिल्हाध्यक्ष  पद कोणाला दिले तर बाळ माने  दिल.या सगळ्या गोष्टी  संघटनात्मक असतील किंवा प्रत्येक गोष्ट सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मी काम करत असताना सर्वात सर्वात उजवा माप कोणाला जर दिल असेल तर ते बाळ माने ना दिल. हे सगळे का सांगतोय तर  मला संपूर्ण महाराष्ट्राचा प्रचार करायचा आहे.मला महाराष्ट्रभर फिरायचे आहे माझी जबाबदारी आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बूथ कमिटीच्या सदस्यावर संपवून जाणार आहे.

 
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्या विचाराबरोबर ज्यांनी गद्दारी केली असेल त्याला त्याची जागा या महायुतीच्या रणांगणात दाखवून दिली पाहिजे. हे युद्ध विचाराचे युद्ध आहे भारतीय पार्टीबरोबर ज्यांनी ज्यांनी संघर्ष केलाय त्याला त्याची जागा दाखवणे आवश्यक आहे. रत्नागिरी मध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि विचार जगणे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं काम असणार असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page