नेरळ बदलापूर राज्यमार्ग रस्त्यात आठवड्यात दुसरा अपघात…

Spread the love

नेरळ बदलापूर राज्यमार्ग रस्त्यात आठवड्यात दुसरा अपघात…बांधकाम विभाग लक्ष देणारं ?

नेरळ: सुमित क्षीरसागर कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ आणि शेलू या भागात या आठवड्यात सलग दुसरा अपघात झाला आहे.अरुंद रस्ता आणि मोठा गतिरोधक यामुळे सलग दुसरा अपघात झाला असून रस्ता दुपदरी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत नसल्याने रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याची माहिती शेलू ग्रामपंचायत सरपंच शिवाजी खारीक यांनी दिली आहे.आजच्या अपघातात देखील कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.


कर्जत कल्याण राज्यमार्ग वरील नेरळ बदलापूर या भागात रस्ता 100 मीटर भागात एकपदरी होतो.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते.मात्र गेल्या आठ दिवसात दुसरा अपघात या भागात झाला असून ते दोन्ही अपघात यांची घटना सारखीच आहे.आज 20 ऑक्टोबर रोजी दुपारी कर्जत कडून बदलापूर कडे जाणारा एम एच 12-1658 हा टेम्पो शेलू येथे रस्ता अचानक निमुळता झाल्याने तेथील गतिरोधक वर कडकडून ब्रेक लावतो.मात्र त्याचवेळी बदलापूर भागातील मारुती बलेनो ही कार एम एच 05- बी डब्लू 5470 टेम्पो वर जावून आदळली.त्यात टेम्पो रस्त्याच्या खाली खड्ड्यात जावून आदळला. त्यामुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून स्थनिक पोलीस पाटील मनोज पाटील यांनी अपघाताची माहिती नेरळ पोलीस ठाणे यांना कळविली. त्यानंतर नुकसान झालेली कार तोइंन करून बदलापूर येथे नेण्यात आली.तर टेम्पो क्रेंनचे सहायाने उचलून बाहेर काढण्यात आला.याच आठवड्यात असाच अपघात टेम्पो आणि ईतिका कार यांच्यात झाला होता.या दोन्ही अपघात मध्ये कोणीही मोठे जखमी झाले नसल्याने नेरळ पोलीस ठाण्यात या दोन्ही अपघात यांची नोंद झालेली नाही.


कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ शेलू भागात शेलू गावात वळण्यासाठी रस्ता आहे.त्यामुळे तेथे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गतिरोधक बसविले आहेत.परंतु त्या भागात असलेल्या वन जमीन असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याला रस्त्याचे दुपदरी करण करता आले नाही.त्याचवेळी शेलू भागातील त्याच ठिकाणी कल्याण कर्जत रस्ता हा थेट एकपदरी होतो.त्यामुळे नव्याने वाहन चालवत असलेल्या वाहनचालक यांना दुपदरी रस्ता अचानक एक पदरी होतो याबद्दल माहिती नसते आणि त्यामुळे वाहन चालक गतिरोधक बघून कडकडून ब्रेक लावतात आणि त्यानंतर अपघात होतात.त्याचवेळी एकेरी रस्ता असल्याने वाहने रस्त्याच्या खाली जात असल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वन विभागाची परवानगी घेवून दुपदरी करण्यात यावा अशी सूचना आणि मागणी शेलू ग्रामपंचायत सरपंच शिवाजी खारीक यांनी केली आहे.या कर्जत कल्याण रस्त्याचे दुपदरीकरण झाल्यानंतर 12 वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाला वन जमीन ताब्यात घेवून रस्त्याचे रखडलेले दुपदरीकरण करता आले नाही,त्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page