राहुल गांधींकडे सगळे डब्बे आहेत- फडणवीस:त्यांच्याकडे इंजिन नाही, फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले- आमची विकासाची गाडी…

Spread the love

राजापूर/ रत्नागिरी- लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्यासमोर केवळ दोन पर्याय आहेत. एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे राहुल गांधी आहेत. महाराष्ट्रातही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा घोषित केला. परंतु त्यांचा मूळ जाहीरनामा हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे. केवळ दहा जागांसाठी जाहीरनामा नसतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. यावेळी फडणवीस राजापूरी येथे नारायण राणेंच्या मतदार संघाला संबोधित करत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यावरही फडणवीस यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शरद पवार हे 542 पैकी फक्त दहा सीट लढवत आहेत. तरीदेखील त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांचा जाहीरनामा चालणार नाही. तर राहुल गांधींचा जाहीरनामा चालणार कारण ते त्यांचे नेते आहेत. उद्धव ठाकरेंनीही जाहीरनामा प्रसिद्ध केला. परंतु त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध व्हायलाही तयार नव्हता. तो जाहीरनामा हातात घेताच खाली पडला आहे.

आपली गाडी विकासाची गाडी…

सबका साथ सबका विकास म्हणत आमची गाडी पुढे जात आहे. राहुल गांधींकडे इंजिन नाही, तर तिकडे सगळे डब्बे आहेत, असे म्हणत फडणवीसांनी परीवारवादावरही हल्ला चढवला आहे.

मोदींनी गेल्या दहा वर्षात देश बदलला. वीस कोटी लोकांना पक्के घर मिळाले. जनतेला गॅस, आयुष्मान भारतद्वारे मोफत उपचार, उद्योजकांना बिनव्याजी कर्ज दिले. त्यासोबतच ३१ कोटी महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. यापुढे आता मोदीजींनी २० कोटी रुपये बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२६ नंतर ३३ टक्के महिला आमदार आणि खासदार होणार आहेत. महिलांना प्रत्येक ठिकाणी बरोबरीचा अधिकार मिळायला हवा. शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच महाराष्ट्राला शेतकऱ्यांना सिंचनासाठी २६ हजार कोटी रुपये दिले.

महाराष्ट्राने अडीच वर्ष वसूली सरकार पाहिलं…

महाराष्ट्र हा गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. हे सरकार वसूली करणारं सरकार नाही आहे. अडीच वर्ष जनतेन वसूली सरकार पाहिलं. हे सरकार लोकांना देणारं सरकार आहे. या देशात मजबूत सरकार असल्याने आता लोकांचा विचार बदलत आहे. कोविडनंतर जगाची आशा ही भारताकडे आहे. फॅक्टरी ऑफ वर्ल्ड आता भारत होणार या आशेने जग भारताकडे पाहत आहे. एक लाखापेक्षा जास्त स्टार्टअप हे देशात तयार झाले आहेत.

नारायण राणेंबद्दल बोलतांना फडणवीस म्हणाले की, नारायण राणे जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी त्यांच्या मनात कोकणाचा विचार असतो. त्यांच्या डोळ्यासमोर कायम कोकणासाठी काय करता येईल हा एकच विचार नेहमी असतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page