
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भात माहिती दिली….
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी एक पोस्ट शेयर केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भात माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? –
“मित्रांनो, मला माहिती आहे, पेपर लीक ही किरकोळ विषय नाही, लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप त्रासदायक आहे. त्यामुळं पेपर लीक घटनेनंतर आतापर्यंत गेल्या अडीच महिन्यात अनेक पावलं टाकण्यात आली. गुन्हेगारांना पकडण्यात आलं, ते तुरुंगात आहेत. आपली महत्त्वाची जबाबदारी होती, विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, तात्काळ परीक्षा घेण्याची गरज होती. सरकारनं सर्व शक्तीचा वापर करत 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजन केलं. पाच सहा दिवसांपूर्वी 19 तारखेला निकाल देखील आला. देशात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या बातम्या देखील आल्या.”
“आम्ही त्यामध्ये समाधान माननारे लोक नाही, मी आज फास्ट ट्रॅक कोर्टासाठी विभागांना आदेश दिले होते. विभागानं दिवसभर मेहनत करुन रात्री मला मसुदा दिला आहे. फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेचा मसुदा त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, तिथं अंतिम चर्चा होईल. सोमवारपासून संसद अधिवेशनाचा दुसरा आठवडा येईल, त्यावेळी लवकरात लवकर ते बील पास करण्याचा प्रयत्न केला जाईल,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“मी संबंधित विभागांना ‘फास्ट-ट्रॅक’ न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिले. विभागांनी मला उशिरा रात्री यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला. ‘फास्ट-ट्रॅक’ न्यायालय आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या या प्रस्तावावर शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सूचनांनंतर याला अंतिम स्वरूप दिले जाईल आणि सोमवारपासून संसदेचे दुसरे आठवड्याचे कामकाज सुरू होत असल्याने, हे विधेयक लवकरात लवकर सभागृहात मंजूर करून घेण्याचे प्रयत्न केले जातील,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली; कारण मध्यरात्रीच्या सुमारास प्रसिद्ध केलेल्या आपल्या व्हिडिओ संदेशात मोदींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा टाळला होता.
राहुल गांधी यांच्या तीन मागण्या –
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नये. विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मध्यरात्रीच्या या केविलवाण्या व्हिडिओद्वारे त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका.”* *“1. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा. 2. ज्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यांना शिक्षा करा. 3. माफी मागा,” अशी तीन मागण्या राहुल गांधी यांनी करत टीका केली.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*