
देवरूख शहराच्या विकासासंदर्भात केली सविस्तर चर्चा; रवींद्र चव्हाण यांचा सकारात्मक प्रतिसाद
*देवरूख-* देवरूखच्या विकासासाठी नगराध्यक्षा सौ. मृणाल अभिजित शेट्ये यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज सोमवारी मुंबईत सदिच्छा भेट घेतली. या भेटीत देवरुख शहर व देवरुखवासीयांशी निगडित विविध महत्त्वपूर्ण प्रश्न, विकासकामे आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींवर सविस्तर चर्चा केली. यावेळी देवरुखच्या सर्वांगीण विकासासाठी साहेबांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, अशी विनंती सौ. शेट्ये यांनी केली.
*या भेटीदरम्यान प्रामुख्याने*
▪️देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर
▪️देवरुख शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठा योजना
▪️परशरामवाडी येथे बंधारा उभारणी
▪️प्रभागांतर्गत विविध विकासकामे
▪️घरकुल योजना राबविताना येणाऱ्या अडचणी
▪️देवरुख व आजूबाजूच्या गावांमध्ये गटबुक नकाशे उपलब्ध नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या
यांसह देवरुख शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रवींद्रजी चव्हाण यांनी सर्व विषयांची सकारात्मक दखल घेत संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाहीसाठी पत्र दिले. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे देवरुखच्या विकासाच्या दृष्टीने पुढील पाठपुराव्यास निश्चितच बळ मिळाले आहे. यावेळी देवरुख नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांच्यासोबत सहकारी नगरसेविका सौ. समृद्धी वेलवणकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. अभिजीत शेट्ये, संगमेश्वर तालुका सरचिटणीस श्री. संदीप वेलवणकर तसेच श्री. संजय राजवाडे उपस्थित होते. देवरुखवासीयांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि देवरुख शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शासनाच्या प्रत्येक स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचा आमचा संकल्प आहे. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सकारात्मक सहकार्याबद्दल नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*