‘या’ गोष्टींचा विचार करून वेळ घालवू नका वाया; अन्यथा जीवन होईल अंधःकारमय! वाचा अनमोल उपदेश..

Spread the love

भगवान श्रीकृष्ण सांगतात की, काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करणे आणि वेळ वाया घालवणे निरर्थक आहे.

आपल्यापैकी अनेक लोकांना अगदी लहानपणापासूनच श्रीमद भगवद्गीता आणि त्यातील उपदेश शिकवले जातात. गीतेमध्ये एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. भारतीय हिंदू धर्मातील हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. आता त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले असले, तरी हा ग्रंथ केवळ संस्कृत भाषेतच तयार झाला आहे. कुरुक्षेत्राच्या मैदानात तब्बल ४५ मिनिटांत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला गीतेचे ज्ञान दिले होते. यामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली होती. यावेळी भगवान कृष्णाने आपले विश्व स्वरूप देखील प्रकट केले आणि अर्जुनाला म्हटले की, आत्मा अमर आणि अविनाशी आहे, तर शरीर नश्वर आहे.

कर्तव्य पूर्ण करा!

श्रीकृष्णाने हे उदाहरणही दिले की, ज्याप्रमाणे माणूस जुने कपडे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. हे सांगताना त्यांनी अर्जुनला कर्तव्य बजावण्याचे महत्त्व सांगितले. श्रीकृष्णाने स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीचा धर्म कर्तव्य बजावणे हाच आहे. तर, अर्जुनाचा धर्म क्षत्रिय म्हणून लढणे आहे. अर्जुनाने आपल्या कर्तव्यापासून दूर राहिल्यास किंवा आपल्या धर्माच्या विरुद्ध गेल्यास ते चूक ठरेल. युद्धात योद्धा मारला गेला, तर स्वर्ग प्राप्त होतो आणि जिंकला तर पृथ्वीवर राज्य मिळते, असेही श्रीकृष्ण म्हणाले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लढणे हे योद्ध्याचे कर्तव्य असते. तर, आज आपण गीता प्रवचनात नमूद केलेल्या अशाच काही गोष्टी जाणून घेऊया…

‘अशा’ गोष्टींचा विचार करणे निरर्थक-

भगवान श्रीकृष्ण सांगतात की, काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करणे आणि वेळ वाया घालवणे निरर्थक आहे. गीतेच्या शिकवणीनुसार, ज्या गोष्टी तुम्ही कधीही बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करून वेळ वाया घालवू नका. ज्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो आणि ज्यामध्ये आपण सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, त्यावर आपण आपले लक्ष आणि ऊर्जा केंद्रित केली पाहिजे. ज्या गोष्टी आपण कधीच बदलू शकत नाही, त्याबद्दल विचार करून वेळ वाया घालवल्याने आपली मानसिक शांतता नष्ट होते आणि आपल्याला विनाकारण चिंता वाटते.

गीतेत श्रीकृष्ण अर्जुनला शिकवतात की, आपण आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्याच्या परिणामावर नाही. आपण वर्तमानात राहून आपले कर्तव्य बजावले पाहिजे आणि आपल्या प्रयत्नात प्रामाणिकपणे आणि समर्पणाने कार्य केले पाहिजे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page