मतदार यादीत नाव आहे का तपासून घ्या, ९ डिसेंबरपर्यंत दावे, हरकती नोंदवा – जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

Spread the love

ठाणे : निलेश घाग मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जिल्ह्यात सुरू आहे. निवडणूका न्याय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावती करण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्यानुषंगाने दि.२७ ऑक्टोबर २०२३ ते दि.०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नोंदणी करावी तसेच मतदारयादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदारा यादीचा संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुषंगाने दि.२७ ऑक्टोबर २०२३ ते दि.०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत मतदारांनी आपले नाव मतदारयादीत आहे की नाही याची खात्री करावी. तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाची नोंद मतदारयादीत नसल्यास नमुना नंबर ६, ज्या मतदारांच्या नावात / पत्त्यात दुरूस्ती असल्यास नमुना नंबर ८ तसेच कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत / कायमस्वरुपी स्थलांतरीत असल्यास नमुना नंबर ७ भरण्यात यावा. तसेच दि.०४ नोव्हेंबर २०२३ (शनिवार), दि.०५ नोव्हेंबर २०२३ (रविवार), दि.२५ नोव्हेंबर २०२३ (शनिवार) व दि.२६ नोव्हेंबर २०२३ (रविवार) या दिवशी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसेच विशेषतः असंरक्षित आदिवासी गट अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी. मतदारयादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शिनगारे व उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page