![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/10/Maharashtra-Police-Vacancy-1.jpg)
मुंबई :- गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. आता यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्यास हिरवा कंदील दिला आहे.
आता मुंबईत कंत्राटी पद्धतीने ३ हजार पदे भरण्यात येणार आहेत. ही पद ११ महिन्यांसाठी असणार आहेत. मुंबईत भरती करण्यास गृह विभागाने मंजूरी दिली आहे. यासाठी ३० कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार आहेत. राज्य सुरक्षा महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे.
मुंबई पोलिसांकडे मनुष्य बळाची कमतरता आहे. दुसरीकडे नव्याने पोलिस भरती प्रक्रियेसाठी अवधी असून तोपर्यंत ही कंत्राटी पदे भरली जाणार आहेत. यासाठी पोलिस आयुक्तांनी सरकारला विनंती केली होती, ही विनंती आता गृह विभागाने मान्य केली आहे.
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231009-WA0001-1.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231007-WA0051-1.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231006-WA0040-2.jpg)