मोठी बातमी! महायुतीचा तिढा सुटला? रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या पारड्यात, नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात…

Spread the love

अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपलाच …. आज किंवा उद्या होणार नारायण राणे यांच्या नावाची घोषणा..

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला. महायुतीकडून भाजप उमेदवार देणार, केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात उतरणार.

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) घोषणा झाली. आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली जाणार आहे. परंतु, अजूनही महायुतीतील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव काही घेत नाही. काही जागांवरुन महायुतीच्या घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू होतं. अखेर या जागेचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. हा मतदारसंघ भाजपच्या (BJP) पारड्यात पडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपच्या पारड्यात पडली असून या जागेवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आजच नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ नेत्यांनी नारायण राणे यांची समजूत करण्यात यश आले आहे.
सदर मतदार संघात नारायण राणे यांची नाव पहिल्यापासून चर्चा होते. परंतु तब्येतीच्या कारणाने नारायण राणे इच्छुक नसल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हणणे होते.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळी निलेश राणेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे नारायण राणे मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणे कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात…

भारतीय जनता पार्टी मध्ये नारायण राणे यांच्या नावाची वरिष्ठ नेत्यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग साठी उमेदवार म्हणून पहिली पसंती होती. तशी भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्ता ते अगदी जिल्हास्तरापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची मागणी होती. व आज पक्षाने नारायण राणे यांचे नाव निश्चित केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी गेली चार ते पाच वर्ष मोर्चे बांधणी चालू केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष होते. सदर मतदार संघामध्ये मतदार केंद्र रचनेपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची पकड आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला त्यामुळे स्थानिक नेत्यांची रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळावी असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून प्रमोद जठार सदर मतदार संघात गेली चार वर्षे काम करत आहेत त्यांनीही या मतदारसंघात प्रवास केला आहे त्यामुळे तेही या मतदारसंघातून इच्छुक होते. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी व त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांनी काम केले आहे. रत्नागिरी मध्ये निलेश राणे खासदार होते त्या वेळेपासून एक युवकांचा मोठा पाठबळ त्यांच्या पाठीशी होता व आजही तो आहे. निलेश राणे यांची स्वतःचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्ते व च्या संपर्कात असणाऱ्या कार्यकर्त्यांची ही निलेश राणे यांच्या नावासाठी मागणी होते. तसेच या मतदारसंघातून माजी आमदार बाळ माने यांचेही नाव चर्चेमध्ये होते. मध्यंतरी नारायण राणे इच्छुक नसल्याने विनोद तेवढे यांचे नाव जवळजवळ निश्चित झाल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांच्या मध्ये दिसून आली होती. नारायण राणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी बारा वाजेपर्यंत होऊ शकते.

राणे-सामंतांचा मतदार संघावर दावा, पण अखेर जागा भाजपच्याच पारड्यात …

रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेनं लढली आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनाच लढेल. शिवसेनेनं जागा लढावी,अशी माझी इच्छा आहे. पण याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. एकंदरीत सामंतांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर शिवसेनेचा दावा सांगितला होता. तर, नारायण राणेंनीही रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार, असा दावा केला होता. पण, आता समोर आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच्या पारड्यात पडली असून आता शिंदेंच्या हातून अमरावतीपाठोपाठ आणखी एक जागा जाणार असं दिसतंय.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गची ही जागा शिवसेना-भाजप युतीवेळी शिवसेनेच्या वाट्याला यायची. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करू शकते, असं उदय सामंतांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत हे या जागेवरून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी नारायण राणे आणि किरण सामंत यांची भेट झाल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतर आता या जागेवरुन नारायण राणे लढवणार असल्याचं समोर आलं आहे.

उदय सामंत यांच्याकडून यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे…

रत्नागिरी सिंधुदुर्ग साठी उद्योग मंत्री उदय संबंध यांचे भाऊ किरण सामंत हे इच्छुक होते. तशी कामाला सुरुवातही त्यांनी केली होती. रत्नागिरी मध्ये शिवसेनेकडून किरण सामान यांच्या नावाची मागणी करण्यात आली होती. उदय सामंत यांनी वारंवार कार्यकर्त्यांची इच्छा किरण सामंत हे खासदार व्हावेत असे आहे. त्यांनी काम केले आहे म्हणून त्यांना तिकीट मिळावे अशी सर्वसामान्य शिवसेनेची इच्छा आहे असे सांगितले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असल्याचे पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट संकेत सूत्रांकडून मिळाले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page