
साखरपा – संगमेश्वर तालुक्यातील मिऱ्या नागपूर महामार्गांवरील आंबा घाटातील दख्खन बस थांब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर झालेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज पहाटे घडली असल्याचे निदर्शनास आली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रामा बाळू माशाळ वय ३० राहणार खिलारहट्टी,तालुका बबलेश्वर जिल्हा विजापूर हा सापुचेतळे ते विजापूर असा जात असताना आंबा घाटात आला असता अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होऊन जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे घडली.
अपघाताचे वृत्त समजताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्य्क पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दुचाकीस्वाराला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र तत्पूर्वी तो मृत झाला होता.
यावेळी देवरुखचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
माझें ऐकले असते तर माझा भाचा जिवंत राहिला असता असे भावनिक उदगार बाळू मल्लारी तांबे यांनी सांगितले. बाळू तांबे यांच्या आईचे निधन झाल्याचे समजताच बाळू तांबे यांचे नातेवाईक विजापूरला मोठी गाडी घेऊन जाण्याचे ठरले.
मात्र रामा माशाळ हा त्यांचे न ऐकता दुचाकीने रात्री दीड वाजता सापुचे तळे येथून विजापूरला जात असताना आंबा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होऊन आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर