तिवरेवर पुन्हा दरडीचे संकट; १५० घरांवर धोका, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण…

Spread the love

*चिपळूण :* दापोली तालुक्यातील तिवरे गावावर पुन्हा एकदा दरडीचे संकट घोंगावत असून, मुसळधार पावसामुळे गावठाण परिसरावरील डोंगराचा भाग खचल्याने सुमारे १५० घरांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी पर्यायी व्यवस्थेअभावी अनेक ग्रामस्थ भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.

तिवरे गावाने यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीचे मोठे चटके सोसले आहेत. २०१९ मधील तिवरे धरण दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २०२२ मध्येही गावातील तीन ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. आता पुन्हा डोंगर खचल्याने संभाव्य दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षित पुनर्वसन व पर्यायी निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

याबाबत स्थानिक ग्रामस्थ प्रकाश शिंदे यांनी प्रशासनाने त्वरित ठोस उपाययोजना करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page