राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी

Spread the love

नवी दिल्ली ‘ राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. परंतु वकिलांनी आणखी वेळ मागितल्याने आज ते युक्तिवाद करणार आहेतशिंदे गटाचे ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे आज युक्तिवाद करतील. तसेच राज्यपालांच्या वतीने सॉलिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार आहेत.मागील सुनावणी २ मार्च झाली होती. यावेळी सुनावणी केवळ २ तासांत संपली. २ मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी संपणार हे जवळपास निश्चित होते. सरन्यायाधिशांनीही तसे संकेत दिले होते. परंतु ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. त्यामुळे सुनावणीला नवं वळण लागलं.उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, त्यावर साळवे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी घेण्याला काही अर्थ नाही, असे साळवे यावेळी म्हणाले होते. केवळ १६ आमदार अपात्र ठरवले गेले तोच मुद्द न्यायालयासमोर असल्याचे साळवे म्हणाले. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर कदाचित त्यांच्या आघाडीतील एखाद्या पक्षाने त्यांची साथ सोडली असती, काहीही होऊ शकले असते? असा सवाल देखील उपस्थित केला. या युक्तीवादामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page