
लोकलमध्ये महिलांनी गोंधळ घातल्याने रेल्वे वाहतूक उशिराने असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेतलं आहे.
ठाणे; प्रतिनिधी (निलेश घाग) मुंबईला कामाला जाण्यासाठी चाकरमान्यांची मध्य रेल्वे कडून होणारी गैरसोय नेहमीच प्रवाशांना अनुभवायला मिळते. असाच एक प्रकार आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकात घडला. लोकल काही वेळ थांबली आणि लगेच निघाली त्यामुळे काही महिलांनी लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. चक्क एक महिला तर मोटरमनच्या केबिनमध्येच चढून तिने लोकल थांबवली आणि १० ते १५ मिनिटे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.
दिवा स्थानकात मोठा गोंधळ झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. लोकलमध्ये महिलांनी गोंधळ घातल्याने रेल्वे वाहतूक उशिराने असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेतलं आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे. पहाटे दिवा स्थानकात गोंधळ घडल्याची माहिती समोर येत आहे.
दिवा स्टेशनमध्ये गोंधळ महिला मोटरमनच्या केबिनमध्ये चढल्याने लोकल १० मिनिटे थांबली. या महिलेचं म्हणणे हेच होते की,महिला लटकत आहेत थोडा वेळ थांबा. हे बघून RPF आणि GRP तिथे आले. यावेळेच बाकी प्रवासीही मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अखेर मोटरमनच्या केबिनमधून खाली उतरली आणि लोकल सुटली.मात्र आता कारवाई करण्यासाठी GRP आणि RPF ने ५ महिलांना ताब्यात घेतलं आहे. यामहिला सध्या दिवा स्थानकात GRP ऑफिसमध्ये आहेत. दरम्यान, या महिलांवर कारवाई होऊ नये म्हणून दिवा प्रवासी संघटना प्रयत्न करत आहे.
नेमकं काय घडले दिवा स्थानकात
आज सकाळी सातची लोकल मुंबईला जाण्यासाठी निघाली होती. मध्य रेल्वेच्या दिवा स्टेशनमध्ये काही महिलांना या लोकलमध्ये बसण्यासाठी मिळाले नाही. त्यामुळे महिलांनी चक्क लोकलच थांबून धरली. महिला डब्यातील काही महिला एका
महिलेला सहकार्य करत तिला मोटरमनच्या केबिनमध्ये पाठवले मोटरमन गाडी थांबत नव्हता त्यामुळे महिलांनी गोंधळ केला, असं समजतंय.महिला एकत्र आल्या तर काय होऊ शकतं याचे
उदाहरण आज दिव्यामध्ये पाहायला मिळालं. दरम्यान, या महिलांकडून पोलिसांना देखील अरेरावी करण्यात आली. महिला मोटरमनच्या केबिनमध्ये बसून गाडी चालवा, असे ती बोलत होती. कसेबसे या महिलेला मोटरमनच्या केबिनमधून खाली उतरवलं.
जाहिरात


जाहिरात

जाहिरात


जाहिरात
