दापोली भीषण अपघात: मृतांचा आकडा गेला नऊवर, जखमी भूमीचा अखेर मृत्यू

Spread the love

दापोली : आसूद -जोशी आळी येथे टाटा मॅजिक व ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात गंभीर जखमी झालेली अठरा वर्षीय भूमी हरिष सावंत ही गेली नऊ दिवस मुंबई येथे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. अखेर काल, रविवारी रात्री तीचा मृत्यू झाला. भूमीच्या मृत्यूने या अपघातातील मृतांची संख्या नऊ झाली. दि. २५ जून रोजी हा अपघातात झाला होता.
दापोली ते हर्णै प्रवासादरम्यान अपघातात भूमीसह तिची बहिण गंभीर जखमी झाली होती. भूमी गेली नऊ दिवस मृत्यूची झुंज देत होती. अखेर तिचा मृत्यू झाला. तर तिची लहान बहिण मुग्ध मृत्यूशी झुंज देत आहे.
भूमीने इंदूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धेत राष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावले होते, ती मर्दानी खेळात पारंगत होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page