
चिपळूण :- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलला पहिल्याच मुसळधार पावसात धोका निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे माती वाहून गेल्याने संरक्षक भिंतीचा पाया कमकुवत झाला असून बांधकामाला जागोजागी तडे गेल्याने भिंत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवामहामार्गाच्या रुंदीकरणावेळी परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले होते. काही ठिकाणी भराव टाकून रस्त्याची उंची वाढवण्यात आली. त्यानंतर घाट आणि महामार्ग सुरक्षित राहावा तसेच दरडी कोसळण्याचा धोका कमी व्हावा म्हणून या ठिकाणी गॅबियन वॉल उभारण्यात आली होती. परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे-परशुराम परिसरात वारंवार दरडी कोसळतात. या दरडी गावाच्या दिशेने येऊन झाडे आणि परिसराचे नुकसान करतात. त्यामुळे गाव आणि मुंबई-गोवा महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी ही गॅबियन वॉल महत्त्वाची मानली जाते. मात्र, पहिल्याच पावसात गॅबियन वॉलच्या पायाखालची माती वाहून गेल्याचे चित्र समोर आले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*


