आंबा घाटात ३ बोगदे होणार; आंबा घाटातील धोकादायक प्रवास टळणार…

Spread the love

*रत्नागिरी-* आंबा घाट हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. रत्नागिरीतून कोल्हापूरला जाताना किंवा कोल्हापूरातून रत्नागिरीला यायचे असेल तर आंबा घाटाशिवाय पर्याय नाही. आंबा घाट जितका सुंदर आहे तितकाच तो धोकादायक देखील आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा धोकादायक प्रवास टळणार आहे. रत्नागिरीतून कोल्हापूरला जाताना आता सर्वात खतरनाक आंबा घाट लागणार नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा धोकादायक प्रवास सुलभ आणि जलद करण्यासाठी एक विशेष प्रोजेक्ट हाती घेतला आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंबा घाटही एक धोकादायक घाट आहे. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी यामुळे या घाटात अपघात होत असतात. या घाटातून प्रवास करणे म्हणजे एकप्रकारे तारेवरची कसरतच असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही कोकण आणि कोल्हापूर दरम्यानचा हा एक प्रमुख दुवा होता. आंबा गावाच्या नावावरून या घाटाला ‘आंबा घाट’ हे नाव पडले आहे. ब्रिटीश काळात आंबा घाट बांधण्यात आला. आंबा गावातील एका स्थानिक मेंढपाळाने दाखवलेल्या वाटेवरून या घाटाची पाहणी करून ब्रिटीश इंजिनयर्सनी हा रस्ता तयार केला, असे सांगितले जाते. कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडण्यासाठी आंबा घाट बांधण्यात आला.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर (NH 204) असून  समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवर आंबा घाट आहे.  कोल्हापूर आणि कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनासाठी एक प्रमुख आणि निसर्गरम्य मार्ग आहे. 

आंबा घाटातील थरारक प्रवास सुरक्षित आणि जलद व्हावा यासाठी  कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील एनएच-166 येथे बोगदे बांधले जाणार आहेत. आंबा घाट बोगदा प्रकल्पांतर्गत 3 बोगदे बांधले जात आहेत. या बोगद्यांमुळे धोकादायक वळण टळणार आहे. धोकादायक टाळून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रादरम्यानचा संपर्क सुधारला जाणार आहे. कोकण आणि विदर्भाला जोडणा-या मि-या-नागपूर महामार्ग प्रकल्पाअंतर्गत हे बोगदे बांधले जात आहेत.   हा महामार्ग प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, 95 काँक्रिटींग पूर्ण झाले आहे. आंबा घाटातील वळणावळणाचा धोकादायक प्रवास जलद, सुरक्षित आणि जवळपास सरळ मार्ग व्हावा यासाठी हे बोगदे बांधले जाणार आहेत.

धोकादायक आणि असमान रस्त्यांमुळे आांबा घाटाचा 7 किलोमीटरचा भाग सरळ करण्यासाठी 3 बोगदे बांधण्याची योजना आहे. आंबा घाटातील वाहतूक सुरक्षित आणि वेगवान कररण्यासाठी 3.5 किमी लांबीच्या एका मोठ्या बोगद्यासह एकूण तीन बोगदे बांधले जाणार आहेत. आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी विशेषज्ञांमार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. आंबा घाटात बोगदे बांधल्यावर प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. पावसाळ्यात आंबा घाटात प्रवास अधिक धोकादायक असतो. घाटात दरडी कोसळण्याचा धोका अलतो. रस्ता निसरडा होतो यामुळे पावसाळ्यात आंबा घाटात अपघातांंचा धोका सर्वाधिक असतो. या बोगद्यांमुळे रत्नागिरीतून कोल्हापूरला जाताना धोकादायक आंबा घाट बायपास होणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. कोकण आणि कोल्हापूर दरम्यानची वाहतूक अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे. 

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page