
सिधुदुर्गनगरी – स्वच्छता उपक्रम असो किंवा गावाच्या विकास उपक्रमात आपल्याला मिळालेले बक्षीस त्याहीपेक्षा अधिक मोठे बक्षीस मिळण्यासाठी प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे ,देश प्रगती वर नेण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असून स्वच्छते च्या स्पर्धेच्या युगात जिल्हा टिकून राहण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आपण अव्वल राहणे गरजेचे आहे,आपल्याला मिळालेल्या पारितोषकामुळे जबाबदारीही वाढली आहे ,अशा पुरस्कारांमुळे गावाचे हे नाव उज्वल तर होईल परंतू गावातील वाढते स्थलांतर थांबवण्यासाठी आणि गावाचा उत्पन्नाचा स्त्रोत , रोजगार वाढविण्यासाठी प्रत्येकाचे राजकारण विरहीत योगदान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले .
सिंधुदुर्ग नगरी येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभाग जिल्हास्तरीय जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध चित्रकला वक्तृत्व लघु चित्रपट स्पर्धेचे बक्षीस वितरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रजनन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केलेयावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख माजी आमदार राजन तेली प्रभाकर सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे विनायक ठाकूर ,निलेश सामंत सरपंच आशा मुरमुरे ,सुप्रिया वालावलकर, निलेशसामंत सर्व गटविकास अधिकारी खाते प्रमुख जिल्ह्यातील सरपंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पारितोषक विजेते विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल वालावलकर यांनी केले तर प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले स्वच्छता हा आपल्या जिल्ह्यातील वारसा आहे संस्कृती आहे पण ती स्वतःपुरती न ठेवता स्वच्छता सार्वजनिक ठिकाणीही पाहायला हवी असे विचार त्यांनी व्यक्त केले यावेळी जिल्ह्यातील स्वच्छ जिल्हास्तरीय तालुकास्तरीय गाव स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात आलेयावेळी बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सोहळा महत्त्वाचा आहे .आज हे जग स्पर्धेचे जग आहे प्रत्येक गोष्टी स्पर्धा आहे या स्पर्धेत कोण जिंकतो कोण विजय होतो या स्पर्धेत जिंकताना छोट्या छोट्या गोष्टीतून देश जगाचे स्पर्धेत जिंकणार आहे.
याचीही नांदी आहेपाण्याचे योग्य नियोजन करणारे इस्राईल देश आज प्रगत देश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गोष्टीत स्वतंत्र पूर्व काळात स्वच्छतेचे महत्व गांधीजींनी सांगितलेले विचार आत्मसात केले गेल्या 75 व्या वर्षात आपण पदार्पण करूनही आज स्वच्छतेकडे आप्पासाहेब पटवर्धन वगळता कोणी लक्ष दिला नाही प्रधानमंत्री झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी स्वच्छते सह विविध क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी आपण पंतप्रधान झालो तर देशात महासत्ता आणण्याचा संकल्प केला होता प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजेस्वामी विवेकानंदांनी युवकांच्या चळवळीत ध्येय निश्चित करून त्या दिशेने झपाटा लावला एखाद्या ग्रामपंचायतीने आपण निवडून आलो पाच वर्षासाठी संधी आहे या पाच वर्षांमध्ये स्वच्छता सह विविध उपक्रम कामे पूर्ण करेल गावाचा विकास करेल सर्वसामान्यांसाठी लोकं प्रतिनिधी म्हणून काम करताना बक्षीसाबरोबर तेथील मतदाराशीआपण पाच वर्षासाठी केलेली कमिटमेंट उत्तरदायी ठेवून लोकशाही संविधानाने दिलेली जबाबदारीआहे ग्रामसेवक हे नाव जरी छोटे असलेतरी त्यांची जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पडतात कोणी व्यक्ती ज्ञानी नाही .
या स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला मग आपल्याला पहिला दुसरा क्रमांक का मिळाला नाहीआपले कर्तव्य याची कमतरता याचा विचार केला पाहिजे देश प्रगती पर नेण्यासाठी स्वच्छतेबरोबर उत्पन्न रोजगार वाढविण्यासाठी लक्ष दिले पाहिजे सिंधुदुर्ग जिल्हा वर्षांवरचे स्वच्छतेत अहवाल आहे स्वच्छतेच्या जगात टिकून ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध राहणे गरजेचे आहेएखाद्या ग्रामपंचायत आपण पाच वर्षासाठी दिलेली संधी आहे या पाच वर्षाच्या संधीत विविध उपक्रम कसे पूर्ण करता येईल गावाच्या विकास काम करताना छोटे-मोठे बक्षीस मिळवून देऊन येथील मतदारांची केलेली कमिटमेंट उत्तरदायित्व कसे पूर्ण करू शकू आपल्याला लोकशाही संविधानाने दिलेली जबाबदारी आहे गावाच्या विकासासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे कोणी व्यक्ती सर्व ज्ञानी नाही या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठीविविध उपक्रम उत्पन्नाचे स्त्रोत दरडोई उत्पन्न वाढविले पाहिजे , तर देशाचे उत्पन्न जीडीपी वाढू शकतो देशाची टक्केवारी उत्पन्नाची साडेअकरा टक्के होती आज देश पाचव्या क्रमांकावर आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा कन्सल्टन्सी च्या माध्यमातून काम केले आहे.
प्रत्येक गावाचा विकास कसा करता येईल या दृष्टीने प्रयत्न आहेत आपली या पारितोषकामुळे जबाबदारी वाढली असून हे ओझे अजूनस्वच्छतेची सवय आपल्या आचरणात ठेवून चांगल्या गोष्टी ठेवल्यास दिशा देण्यासाठी असे पुरस्कार महत्त्वाचे ठरतात व दिशा देणारे ठरतात याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि राजकारण विरहित गावाचा संघटितपणे विकास साधला पाहिजे विद्यार्थ्यांनाही स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रात यातून प्रगती साधने शक्य असल्याचेही रवींद्र चव्हाण म्हणाले .
यावेळी जिल्ह्यातील संत गाडगेबाबा स्मार्ट ग्राम जिल्हा व तालुकास्तरीय पुरस्कारपालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वितरण करण्यात आलेदुपारच्या सत्रात सरपंच ग्रामसेवक आणि उपस्थितांना प्रशिक्षण मार्गदर्शन करण्यात आलेशेवटी उपस्थिताचे आभार पाणीपुरवठा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी मानले .