
मंडणगड(प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, एन. एस. एस. विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संगीता घाडगे, प्रा. वंदना कदम, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपिस्थत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी प्रा. संदीप निर्वाण यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी सुरुवातीच्या काळात अतिविस्तारीत कार्यक्षेत्र असणारे मुंबई विद्यापीठ महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर प्रमुख शैक्षणिक केंद्र बनले. मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेवून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करुन त्याचे संगोपण करणे आज काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे रक्षण करावयाचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात एकतरी झाड लावावे व आपल्या गावात पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करावी.
यावेळी मान्यवरांच्या यांचे हस्ते चिंच, काजू, आंबा, पिंपळ, आदी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्फुर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी तर आभार डॉ. महेश कुलकर्णी यांनी मानले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*