मुळव्याध पासुन सुटका पाहिजे का?…

Spread the love

मूळव्याध चा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, संडासवाटे रक्त पडणे, मुळव्याधचा त्रास होणे हे आपण घराच्या घरी १० मिनिटांत थांबू शकतो

१. लिंबू व सैंधव मीठ

१.२ लिंबू घ्या, त्याला मधून चिरा.
१.२ त्यावर सैंधव मीठ टाखा.
१.३ ते लिंबु चोखून चोखून .
१.४ आंबट लागल्यास मीठ परत -परत टाखा व लिंबू चोखून चोखून खा (लिंबु संपे पर्यंत).
१.५ हे एकदा जरी केलं तरी १० मिनिटात रक्त पडणे बंद होईल.
१.६ हा उपाय १० दिवस सकाळ-संद्याकाळ जेवल्यानंतर केला तर मूळव्याध पूर्ण बरा होतो.

मुळा

नावाप्रमाणे मूळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो. मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो. थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.

सर्वसाधारण उपचार

मूळव्याधीवर सुद्धा त्रिदोष, व्यक्तीची प्रकृती, रोगाची तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून नेमक्या औषधांची योजना करावी लागते, तरीही यावर सर्वसाधारणतः केले जाणारे उपचार याप्रमाणे-

◼️रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे गायीचे साजूक तूप टाकून घ्यावे.

◼️मोडाच्या ठिकाणी वेदना असल्यास बेलफळाचा गर व पाठाचूर्ण मिसळून घ्यावे किंवा सुंठ व पाठाचूर्ण एकत्र करून घ्यावे.

◼️सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय. सुरण वाफवून केलेली भाजी, फुलका, तूप व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.

◼️रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे.

◼️मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दूर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी.

◼️मोड सुजला असून दुखत असल्यास गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यावी.

◼️कफज मूळव्याध असून मोडाला खाज येत असल्यास जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर सुंठ व ओव्याची पूड टाकून ताक प्यावे.

◼️मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा गर ठेवावा.

◼️तीळ वाटून गरम करून शेकल्यास मोडाच्या ठिकाणची वेदना कमी व्हायला मदत होते.

◼️व्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद अग्नीवर योग्य उपचार करून मूळव्याधीवर खरे उपचार करणे व पथ्य पाळणे आवश्यक असते; अन्यथा पुन्हा त्रास उद्भवू शकतो.

मूळव्याध असो किंवा फिशर, भगंदर असो, एक तर या सर्व रोगांचा त्रास फार भयानक असतो. शिवाय संकोचापायी यांचे वेळेवर योग्य निदान केले जात नाही, परिणामतः उपचारही मिळत नाहीत. त्रास फारच असह्य झाला तर पटकन गुण यावा म्हणून शस्त्रकर्माकडे झुकण्याचा कल वाढतो. क्वचित एखाद्या व्यक्तीमध्ये शस्त्रकर्म, क्षारसूत्र वगैरे उपचारांची आवश्यकता असली तरी केवळ बाह्योपचार रोगाला बरे करण्यास असमर्थ असतात याचेही भान ठेवायला हवे. मंद अग्नी, अपचनाची प्रवृत्ती आणि आतड्यांमधला कोरडेपणा, उष्णता हे सर्व बरे केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आहार-आचरणात काळजी घ्यायला हवी. तरीही त्रास झालाच तर वेळेवर योग्य उपचार घेऊन तो मुळापासून बरा करण्यावर भर द्यायला हवा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page