राज्यात अनेक भागांत जोरधार; नदी, नाले, धरणे ओव्हर फ्लो; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा…

Spread the love

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसाची धुव्वाधार बॅटिंग केली असून यात अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले आहे. तर आगामी २४ तास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत. हवामान विभागाने राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे….

मुंबई/ पुणे : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसाची धुव्वाधार बॅटिंग केली असून यात अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले आहे. तर आगामी २४ तास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत. हवामान विभागाने राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

ही मान्सूनची हालचाल प्रामुख्याने ओदिशावरील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे होत आहे, जो आता पश्चिमेकडील विदर्भ आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनचा जोर पुन्हा वाढला आहे. हवामान विभागाकडूनमुंबईत शनिवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच वाऱ्याचा वेगही जास्त असण्याचा अंदाज ही विभागाने दिला आहे.

सद्यस्थितीत मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. ठाण्यात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. रात्रीपासून अधून मधून पावसाचा जोर कायम असून गेल्या २२ तासात ३१.२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अद्याप कोणत्याही सखोल भागात पाणी साचलेले नाही.

घाटमाथ्यावर रेड अलर्ट, शहरासाठी ऑरेंज अलर्ट…

धरण साखळीतील परिस्थिती पाहता, खडकवासला धरण १०० टक्के भरले असून पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणेही ९० ते ९५ टक्क्यांहून अधिक भरली आहेत. घाटमाथ्यावर रेड अलर्ट आणि शहरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग ५० हजार क्युसेकपर्यंत वाढवला जाण्याची दाट शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. पुरामुळे शहरातील ऐतिहासिक भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून नदीकाठच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी पहाटेपासूनच पुलाचीवाडी, राजपूतनगर आणि एकतानगरी भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला असून प्रशासनाला तातडीने मदतकार्य राबविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page