
*मुंबई-* भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली गेली. या मालिकेतील पाचवा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगला. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो सपशेल अपयशी ठरलेला दिसला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २४७ धावा केल्या तर प्रत्युतरात इंग्लंडला केवळ ९७ धावा करता आल्या.
टी-२० मालिकेत भारताने इंग्लंडचा पराभव केला. रविवारी झालेल्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने १५० धावांनी विजय मिळवला. भारताने मालिका ४-१ ने जिंकली आहे. मुंबईत टीम इंडियासाठी अभिषेक शर्माने अप्रतिम कामगिरी केली. स्फोटक शतक झळकावण्यासोबतच त्याने २ बळीही घेतले. या सामन्यात अभिषेकने अनेक विक्रम मोडीत काढले.
शिवम दुबेही भारतासाठी महत्त्वाचा ठरला. इंग्लंडकडून फिलप सॉल्टने अर्धशतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २४७ धावा केल्या होत्या. यादरम्यान अभिषेकने १३५ धावांची खेळी केली. शिवम दुबेने ३० धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ अवघ्या ९७ धावांवर गडगडला. टीम इंडियाच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही वानखेडे स्टेडियमवर अप्रतिम कामगिरी केली.