![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231208-WA0038.jpg)
देवरुख ; युवा एकता सामाजिक संस्थेतर्फे संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगीरी , मुचरी व मौजे असुर्डे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैव्यवहारप्रकरणी दिनाक ०६ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे होणारे आमरण उपोषण संधर्भात उप जिल्हा अधिकारी रत्नागिरी यांच्या दालनात चर्चा झाली असुन उपोषण करते यांच्या संबंधित मागणीवर निर्णय देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यासोबत चर्चा करुन कारवाई साठी तसेच विभागीय चौकशी साठी काही कालावधी मागितला तसेच उपोषण करू नये असे सुचित केले आहे.
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231208-WA0024-1.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231208-WA0023-1.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/IMG_20231208_101909-1.jpg)
उपजिल्हाधिकारी यांच्या सुचनांचे पालन करत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित अधिकारी यांना २० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे त्या नंतर निर्णय न झाल्यास २१ व्या दिवशी जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याविरोधात निषेध आंदोलन करणार त्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन , पोलिस प्रशासन व विभागीय कोकण आयुक्त जबाबदार असल्याचे पत्र जिल्हापरिषद कार्यालय यांना देण्यात आले आहे.
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/FB_IMG_1699880687577-11.jpg)
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आश्वासन पाळणार का?
१.कोळंबे सोनगीरी – केलेल्या मागणीनुसार मागितलेली माहिती पुढील आठ दिवसात संघटनेला उपलब्ध करून देण्याचे लेखी पत्रक ग्रामपंचायत कोळंबे यांना देण्यात आले आहे.
२.मौजे असुर्डे – केलेल्या मागणीनुसार मुद्देनिहाय चौकशी करून संशयित अपहरित रक्कम भरणेबाबत संबंधित ग्रामसेवक यांना पंचायत समिती स्तरावरून कळविले आहे.
३.मुचरी ग्रामपंचायत – केलेल्या मागणीनुसार संबंधित ग्रामपंचायती मध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता संबंधी जिल्हा परिषद मार्फत वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठविण्यात आला असून वरिष्ठ कार्यालयातून कारवाई अपेक्षित आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वरील दिलेली आश्वासने संघटनेला मान्य नसुन संबधीत दोषींवर व शासकीय कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कायदेशीर करवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी सर्व ग्रामस्थ व संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना लेखी कळवण्यात आले आहे.
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231206-WA0003-6.jpg)
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231205-WA0067-3.jpg)
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231205-WA0066-2.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/Screenshot_2023_0806_110602-12.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/images-10-4.jpeg)