
चिपळूण :- केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानात चिपळूण नगर परिषदेला ५० हजार ते १ लाख लोकसंखेच्या वर्गवारीत पश्चिम विभागातील पाच राज्यामधून (महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश) मधून १० वे मानांकन मिळाले. तर महाराष्ट्रातून ६ वे आणि कोकण विभागातून प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.
चिपळूण नगरपरिषद दोन वर्षापासून मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेबाबत शहरात विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात आले. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे बंदिस्त घंटागाडीद्वारे शंभर टक्के संकलन केले जाते. त्यानंतर शहरातील शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात येते. त्यातील ओल्या कचऱ्यापासून खत व बायोगॅस द्वारे वीज निर्मिती केली जात आहे. त्याशिवाय खत विक्री, सुका कचरा वेगवेगळ्या कंपार्टमेंट वर्गीकृत करून वेंडर ना पुढील प्रक्रियेसाठी विक्री, सिंगल युज प्लास्टिक बंदी, घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया करणे, मैला संकलन करणे व त्यावर शात्रोक्त रित्या प्रक्रिया, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयची स्वच्छता, दिवसा रहिवासी क्षेत्राची साफ-सफाई व व्यापारी क्षेत्राची सकाळी व रात्री अशी दोनदा सफाई केली जाते. रात्रीच्या वेळी बाजारपेठेतील कचरा उचलण्यासाठी संकलीत करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था नगर परिषदेमार्फत केली जात आहे. या साऱ्या उपक्रमांची दखल केंद्र शासनाकडून दखल घेण्यात आली.




