रत्नागिरी वाटद खंडाळा येथे “संविधान सन्मान सभा” उत्साहात संपन्न; ॲड. असीम सरोदे यांचे मार्गदर्शन..

Spread the love

 
रत्नागिरी /वाटद- रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आणि “संविधान सन्मान सभा” मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील आणि कायद्याचे अभ्यासक ॲड. असीम सरोदे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला.

शेतकरी व भूमिपुत्रांसाठी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन यावेळी विचार मंचावर प्रथमेश गावणकर, प्रमुख अतिथी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. संतोष आवले, ॲड. महेंद्र मांडवकर, माजी सैनिक श्री. पाटील, चाफे गावचे माजी सरपंच सुभाष रहाटे आणि सहदेव वीर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्रथमेश गावणकर यांनी आपल्या जीवनातील दुःखदायक प्रसंग, सभोवतालची परिस्थिती आणि राजकीय क्षेत्रातील अनुभव कथन केले. यशस्वी वाटचाल करताना आलेले चांगले-वाईट अनुभव त्यांनी सांगितले. त्यांचे अनुभव ऐकून अनेकांच्या भावना अनावर झाल्या. या सर्व अनुभवांतून आपण घडलो, असे सांगत गावणकर यांनी सर्वांचे जाहीर आभार मानले.

*न्याय हक्काचे दालन” – ॲड. असीम सरोदे*

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. असीम सरोदे यांनी “भारतीय संविधान सन्मान सभा” या कार्यक्रमात बोलताना जाहीर केले की, हे संपर्क कार्यालय शेतकरी आणि भूमिपुत्र यांचे न्याय हक्काचे दालन म्हणून कार्यान्वित झाले आहे. प्रथमेश गावणकर यांनी केलेले काम कौतुकास्पद, प्रामाणिक आणि परिश्रमाने सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे आहे, असे गौरवपर उद्गार त्यांनी काढले. ते म्हणाले, प्रथमेश गावणकर हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे कार्य पुढे नेत आहेत.

*संविधानानुसार नैतिक न्याय हवा: ॲड. सरोदे*

ॲड. सरोदे यांनी भारतीय संविधानाने सर्वांना समान न्याय देण्याची व्यवस्था केली आहे यावर जोर दिला. पोलीस यंत्रणा, शासन, प्रशासन, निवडणूक आयोग, आणि न्यायालयांनी संविधानिक पद्धतीने नैतिक तेला धरून न्याय दिला पाहिजे. जिथे चुकीच्या पद्धतीने वावर दिसेल, तिथे आपण बोलणारच, असा खणखणीत इशाराही त्यांनी मार्गदर्शन करताना दिला.

यावेळी त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि निसर्गरम्य कोकणाचे वैभव जतन करण्यासाठी नागरिकांनी आपल्या जमिनी वाचवाव्यात, असे आवाहन केले. पर्यावरण आणि पर्यटन यातून विकास करण्यासाठी सज्ज व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

*शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर सल्ला…*

प्रथमेश गावणकर यांच्या या ‘शेतकरी भूमिपुत्र न्याय हक्काचे दालन’ कार्यालयात शेतकऱ्यांना जमिनीसंबंधीच्या कामकाजात वकिलांचा मोफत सल्ला मिळणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांना एक उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. गावकऱ्यांनी प्रथमेश गावणकर यांच्या कार्यप्रणालीचे मनापासून अभिनंदन करत आभार मानले आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन मा. शेख यांनी अतिशय सुंदर समालोचनाने केले. या सभेला प्रथमेश गावणकर यांची आई, मावशी, बहिण, भाऊ आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. तसेच, या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती, ज्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page