खेड तालुक्यातील दहिवली येथे भुस्खलन; पालकमंत्री उदय सामंत सकाळी 6 वाजताच घटनास्थळी दाखल…

Spread the love

खेड / प्रतिनिधी- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भीषण भूस्खलनाची घटना समजल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी तातडीने आज सकाळी 6 वाजण्याचा सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी दिले.

पालकमंत्री उदय सामंत यांची कशेडी येथे भूस्खलन झालेल्या जागेला भेट..

मुसळधार पावसामुळे मुंबई – गोवा महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्याच्या तसेच दरड कोसळल्याच्या घटना झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी कशेडी घाटामध्ये भेट देऊन सुरु असलेल्या कामाची पाहणी केली व संबंधिताना आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेडच्या प्रांतअधिकारी  वैशाली माने, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page