४०० वर्षे जुन्या समाधीस्थळ तोडफोड प्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

Spread the love

चिपळूण : तालुक्यातील नागावे येथील सुकाई मंदिरासमोरील पालांडे परिवाराच्या सुमारे ४०० वर्षे जुन्या परंपरागत समाधीस्थळाच्या कथित तोडफोडप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
    
नागावे पालांडेवाडी येथील शिवाजी दत्ताराम पालांडे यांनी २३ जानेवारी रोजी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, सर्व्हे क्रमांक ३५, हिस्सा क्रमांक १९ मधील जागेवर पालांडे परिवाराचे अनेक पिढ्यांपासून परंपरागत  समाधीस्थळ अस्तित्वात आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक, धार्मिक आणि कौटुंबिक वारशाचे महत्त्व असून, काही व्यक्तींनी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने या समाधीस्थळाची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीची सखोल चौकशी, कागदपत्रांची पडताळणी आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी ११ जुलै रोजी प्रकाश पुतळाजी शिंदे, प्रकाश बाबू चिपळूणकर, विष्णू भीमाजी साळवी, सुरेश बाबू साळवी, सुशांत श्रीधर साळवी, सुरेश नारायण साळवी, संजय अनंत झगडे, दीपक विठ्ठल साळवी, रामचंद्र कृष्णा वीर, दत्ताराम कृष्णा वीर, अनंत भीमाजी साळवी, महादेव गणपत साळवी, दीपक यशवंत चिपळूणकर, संभाजी पांडुरंग बगडे, मंगेश मनोहर निगडे तसेच जेसीबी आणि ट्रॅक्टरचे चालक व मालक अशा एकूण १७जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २९८, २९९, ३०१, ३२४(२) आणि ३२९ (३) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धार्मिक स्थळाचे नुकसान करणे, धार्मिक भावना दुखावणे, समाधीस्थळाची विटंबना करणे आणि मालमत्तेची तोडफोड करणे यांसारख्या आरोपांचा या गुन्ह्यात समावेश आहे.
     

दरम्यान, पालांडे परिवाराचा दावा आहे की हे समाधीस्थळ सुमारे चारशे वर्षांपासून अस्तित्वात असून ते त्यांच्या पूर्वजांच्या स्मृतींशी आणि गावाच्या इतिहासाशी निगडित आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page