
➡️दिल्ली – देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या रॅगिंगसह विविध समस्या, शैक्षणिक-अशैक्षणिक समस्या, विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील अन्य तक्रारी असतील, तर आता एक खिडकी पद्धतीने ‘ई-समाधान’ पोर्टलद्वारे सोडविल्या जाणार आहेत.
➡️‘ई-समाधान’ पोर्टल
विद्यापीठ अनुदान आयोगाने हे नवे पोर्टल कार्यान्वित केले आहे.विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी यापूर्वी वापरली जाणारी तक्रार निवारण प्रणाली बंद करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच ‘ई-समाधान’ या नव्या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण होणार असून प्रलंबित तक्रारीही सोडविल्या जाणार असल्याचे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
➡️हे संकेतस्थळ केंद्रीय पद्धतीने आणि एक खिडकी पद्धतीने काम करणार आहे. या संकेतस्थळाद्वारे तक्रारींची पुनरावृत्ती टाळता येणार आहे. या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे विविध प्रश्न, समस्या यावर आवाज उठविता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत नव्याने सुरू केलेल्या पोर्टलची लिंक खालीलप्रमाणे…
⏩
https://samadhaan.ugc.ac.in/Home/Index