गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग; ३१ ऑगस्टपर्यंत चार उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश…

Spread the love

*मुंबई :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि कोंडीमुक्त करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांना आता वेग देण्यात येणार आहे. केवळ कामांचा आढावा न घेता प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मंत्रालयात मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी कोलाड, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी प्रत्यक्ष दिसतील अशा पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रलंबित कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, अशी सूचना करण्यात आली.


दरम्यान, नागोठणे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामासाठी आयआयटीची तांत्रिक मदत घेण्यात येत आहे. तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार असून, तोपर्यंत पुलाच्या दोन्ही बाजूंच्या महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

माणगाव बायपासवरील सुमारे ७.५ किलोमीटरपैकी ५.५ किलोमीटर मार्गावर २० ऑगस्टपासून एकेरी वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर रेल्वे पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेतले जाणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर उर्वरित दोन किलोमीटर मार्गही वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

चिपळूण उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले असून गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाने साथ दिल्यास गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

*गणेशोत्सव अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न..*

मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या इतर भागांतून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना गणेशोत्सव काळात सुरक्षित व सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि निश्चित मुदतीत कामे पूर्ण करावीत, असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

आरवली तळेकांटे कॉन्ट्रॅक्टरला कामे करत नसल्याने मंत्री महोदयांनी झापले..

सदर बैठकीदरम्यान शेलार साहेब नाग मॅडम यांनी केलेल्या तक्रारीनुसार कॉन्ट्रॅक्टर कामे करत नसल्याचे सांगण्यात आले कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जे एम म्हात्रे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. लोकांची कामे पूर्ण करून द्या नाहीतर कारवाई करण्यात येण्याची इशारा देण्यात आलेला आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या मनमानी कारभारीचा मंत्री महोदयांनी समाचार घेतला आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page