
रत्नागिरीत भाजपचा जिल्हा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा; शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पक्षवाढीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते जनतेला जो शब्द देतील, तो पूर्ण केला जाईल. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी ते बोलत होते. या मेळाव्याला जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य सरकार विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत असून जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती दिली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
मेळाव्याला आमदार प्रसाद लाड, प्रमोद जठार, विक्रांत पाटील, भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, अभिजित गुरव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश सचिव ऐश्वर्या जठार यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*