विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा…

Spread the love

दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली  आहे.  जंतर मंतरवर पोलिसी आणि विद्यार्थ्यांमध्ये अचानक संघर्ष सुरू झाला. विद्यार्थी आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.

नवी दिल्ली- दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले आहे.  धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारने धर्मेद्र प्रधान यांना पदावरून हटवले आहे. विद्यार्थ्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या होत्या. यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख अट होती.  सरकारसोबत काल च्या बैठकीनंतर  आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरकारला अल्टीमेटम देण्यात आला होता.  आज पुन्हा बैठक होणार होती. पण आजच्या बैठकीपुर्वीच सरकारने धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेत त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला.

सरकारच्या निर्णयानंतर जंतर मंतरवर मोठा जल्लोष पाहायला मिळाला. अभिजीत दिपके म्हणाले, ही आपल्या एकीची ताकद आहे. देशातील तरुणांच्या एकजुटीची ताकद आहे. गेल्या एक महिन्यापासून मोठमोठे मीडियावाले म्हणत होते, तुम्ही काय करणार, पण आज आम्ही दाखवून दिले.  जेव्हा मी अमेरिका सोडली, तेव्हा पुढे काय होईल याबद्दल लोकांना आश्चर्य वाटत होते. पण धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला.

अभिजीत दिपके म्हणाले, आमची प्रमुख मागणी मान्य झाली असली तरी इतर दोन मागण्यादेखील मान्य  करण्याचे सरकारने मान्य केलं आहे. आंदोलनातील  विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत.  नीट परीक्षेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटींची नुकसान भरपाई मिळावी, यादोन मागण्यादेखील मान्य झाल्या पाहिजेत.  अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या अधिकृत ट्विटर एक्सवरून प्रतिक्रीया दिली आहे. लोकशाही बोलण्याची भिती नसावी, त्यामुळे घाबरू नका, यांना लाईनमध्ये ठेवणे गरजेचे आहे. हेजे स्वत:ला  बादशाह समजू लागले आहेत, ते आपल्यामुळे.

आमच्या अजून दोन मागण्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाा तर झाला पण ज्यां मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना  एक कोटींची मदत मिळालीच पाहिजे. दुसरे २० तारखेच्या मार्चमध्ये ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी ज्या हकरती  केल्या त्यांच्यावरदेखील कारवाई झाली पाहिजे. डिसीपी संदिप लांबा, एसीपी अजय शर्मा,  सचिन शर्मा यांनी अमित शाहा आणि मोदींच्या नावाखाली ज्या लाठ्या चालवल्यात, यांनी लक्षात ठेवा एक राजीनामा झालाय, आता कॉकरोच सोबत पंगा घेऊ नका. जर आम्ही  एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतो तर तुम्ही काय आहात

यादेशातील विद्यार्थ्यांनी खुप हिमतीचे काम केलं आहे. २० तारीख आणि २० तारखेनंतर ज्या ज्या मुलांव केसेस दाखल केल्या आहेत त्या सर्वांवरील गुन्हे मागे घेतले जावेत. असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

शिक्षणमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना राजीनामा पाठवला..

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान मोदींना आपला राजीनामा पाठवला आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे, “मी पंतप्रधानांना माझा राजीनामा पाठवला आहे जेणेकरून देशद्रोही घटक जंतर मंतर आणि देशभरातील परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत, देश एकसंध राहील, भारतीय विद्यार्थ्यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि ते त्यांच्या अभ्यासावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करू शकतील.”

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page