साखरपा गुरववाडीत गव्यांच्या कळप; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…

Spread the love

साखरपा- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील गुरववाडी परिसरात गव्यांच्या मोठ्या कळपाचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलालगत असलेल्या वाड्यांमध्ये गवे वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरववाडी परिसरात अनेक गवे एकत्र फिरताना दिसून आले. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. गुरववाडीचे माजी सरपंच श्री. शशांक लिंगायत यांनी या घटनेची माहिती देत सांगितले की, गव्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page