मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत मंत्री नितेश राणेंचे कौतुक,वॉटर मेट्रोसाठी प्रभावी काम; ३४० किमी वॉटर मेट्रोमार्गांचे जाळे उभारणार..

Spread the love

मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून उभारण्यात येत असलेल्या ‘मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी’मध्ये वॉटर मेट्रो हा गेमचेंजर ठरणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत प्रभावी आणि कौतुकास्पद काम केले आहे, अशा गौरवपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या जलवाहतुकीचा आराखड्यावर भाष्य केले. ६ हजार ६६ कोटी रुपयांच्या या प्रस्तावात ३३ मार्ग आणि ४४ टर्मिनल्ससह तब्बल ३४० किलोमीटर लांबीचे वॉटर मेट्रोचे जाळे उभारण्यात येत असून, हे काम पूर्ण झाल्यावर ही जगातील सर्वात मोठी जलवाहतूक प्रणाली ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी सभागृहात व्यक्त केला.

मुंबईतील वाहतुकीचे एकात्मिकरण (Multimodal Connectivity) करताना जलवाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे. या संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कामाचा विशेष उल्लेख केला. मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबईच्या मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीमध्ये आपण जी वॉटर मेट्रो तयार करतो आहोत, त्यामध्ये आमच्या नितेश राणेंनी खूप चांगल्या पद्धतीने आणि कौतुकास्पद काम केले आहे. या प्रकल्पांतर्गत २०३ पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वेसल्स (जलवाहने) खरेदी केली जाणार असून, २०३१ पर्यंत ७.५ कोटी प्रवासी याद्वारे प्रवास करतील, असे नियोजन करण्यात आले आहे. या महाकाय प्रकल्पाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे काम युद्धपातळीवर सुरू असून वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) ‘पॉड टॅक्सी’ देखील सुरू करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

“मुंबईच्या वाहतुकीला नवा वेग!”,मुख्यमंत्र्यांकडून नितेश राणेंचे विधानसभेत कौतुक…

मुंबई आणि महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी वॉटर मेट्रो प्रकल्प वेगाने पुढे जात असून, या प्रकल्पासाठी मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर कौतुक केले.

“नितेश राणेंनी अत्यंत प्रभावी आणि कौतुकास्पद काम केले आहे” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस

काय आहे प्रकल्पात खास?

▪️ तब्बल ₹६,०६६ कोटींचा प्रकल्प

▪️ ३३ मार्ग आणि ४४ टर्मिनल्स

▪️ ३४० किमी लांबीचे जाळे — जगातील सर्वात मोठी जलवाहतूक प्रणाली होणार

▪️ २०३ इलेक्ट्रिक आणि हायब्रिड बोटींचा समावेश

२०३१ पर्यंत ७.५ कोटी प्रवाशांचे लक्ष्य…

मुंबईतील मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी मजबूत करत जलवाहतुकीला मोठे प्राधान्य देण्यात येत आहे. यासोबतच बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी प्रकल्पही सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. एकूणच, मुंबईच्या ट्रान्सपोर्टमध्ये हा प्रकल्प ठरणार खरा गेमचेंजर ठरणार आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page