कोळंबे हायस्कूलची धोकादायक इमारत अखेर सील,सभापती शर्वरी वेल्ये यांच्या पुढाकाराने निर्णय; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य..

Spread the love

संगमेश्वर /दि ९ जुलै- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणा च्या कामादरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे धोकादायक ठरलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलची नवीन इमारत अखेर गुरुवारी पोलिस बंदोबस्तात सील करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी समयसूचकता दाखवत सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, शासकीय अधिकारी आणि शाळा व्यवस्थापनाची तातडीची बैठक घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे शाळेच्या मागील बाजूस मोठे भूस्खलन झाल्याने इमारतीला गंभीर धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच सभापती शर्वरी वेल्ये यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहणी करून त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर गुरुवारी झालेल्या बैठकीत इमारत विद्यार्थ्यांच्या वापरासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने नवीन इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस पंचायत समिती सदस्य सुहास मांयगडे,  विजय परीट गट शिक्षण अधिकारी, नायब तहसीलदार गिरी, अमर चाळके, नयन मुळ्ये संस्थाध्यक्ष आणि संचालक मंडळ, जे एम म्हात्रे इंजिनिअर, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी , आतिष पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, बुधवारी झालेल्या भूस्खलनामुळे शाळेचे शौचालय पूर्णपणे धोकादायक बनले असून सहा वर्गखोल्यांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. आणखी दरड कोसळल्यास संपूर्ण इमारतीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


महामार्गाच्या कामात संबंधित ठेकेदाराने आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेनंतर सभापती शर्वरी वेल्ये आणि गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक ठरलेल्या सहा वर्गखोल्यांतील विद्यार्थ्यांचे तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुमारे ३५० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने इमारत सील करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page