
राजापूर, प्रतिनिधी : एप्रिल ते जून या मागील तीन महिन्यांच्या कालावधीत राजापूर शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. या कठीण परिस्थितीत नागरिकांनी दाखविलेल्या संयम व सहकार्याबद्दल राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी शहरवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नगराध्यक्षा खलिफे यांनी सांगितले की, पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी प्रशासनाला सकारात्मक सहकार्य केले. तसेच नगर परिषदेचे सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने काम करत पाणीटंचाईशी सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या सहकार्यामुळे परिस्थितीवर प्रभावीपणे मात करणे शक्य झाले.
नगराध्यक्षा खलिफे यांनी या सर्वांचे विशेष आभार व्यक्त करताना भविष्यात शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवू नये यासाठी नगर परिषदेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक नियोजन व शर्थीचे प्रयत्न सुरू असून नागरिकांना भविष्यात अशा संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*