
रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाने राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ घोषित केला आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेची प्रत्यक्ष सुरुवात ३० जून २०२६ पासून होत आहे. पहिल्या टप्प्यातील एसआयआर मॅपिंगचे काम 92 टक्के पूर्ण झाले असून, राज्यात जिल्ह्याची कामगिरी तिसर्या क्रमांकावर आहे. अनमॅपेड आणि विसंगती असलेले जवळपास सव्वादोन लाख मतदार असून त्यांची सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मतदार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदार संघात 1747 बीएलओ मार्फत पहिल्या टप्प्यात एसआयआर मॅपिंगचे काम झाले आहे. जिल्ह्यात 13 लाख 29 हजार 42 मतदार असून 12 लाख 23 हजार 986 मतदारांचे मॅपिंग करण्यात आले आहे. यातील एक लाख पाच हजार 56 मतदार हे अनमॅपेड आहेत. मतदार यादी मॅपिंगची टक्केवारी 92.10 टक्के इतकी आहे. विसंगती असलेले 1 लाख 17 हजार 54 मतदार असून ही टक्केवारी 9.56 इतकी आहे. त्यामुळे अनमॅपेड व विसंगती असलेले 2 लाख 22 हजार 110 मतदार आहेत. यासाठी अनमॅपेड व विसंगती असलेल्या या मतदारांना बीएलओमार्फत नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर याची सुनावणी मतदान नोंदणी अधिकार्यांसमोर होणार आहेत.
सोमवारी जिल्हाधिकार्यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांची बैठक घेत बीएलए नियुक्तीबाबत व मतदार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची माहिती…
दापोली विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, चिपळूण विधानसभा मतदारसंघ उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी विश्वजित गाताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

