संगमेश्वर तालुक्यामध्ये दिग्गजांना पराभूत करून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्थापितांना विचार करायला लावणारे इलेक्शन, संगमेश्वरात ३ जि.प. गटात दिग्गजांचा पराभव…

Spread the love

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला असून तालुक्यातील पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आली आहे. १४ जागांपैकी १० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजप- २, शिवसेना शिंदे गट-४ व राष्ट्रवादी अजित पवार गट- ४ उमेदवारांचा समावेश आहे. तर तालुक्यातील ७ पैकी ४ जि. प. गटांवर शिवसेना शिंदे गट-भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जि. प. निवडणुकीतही तालुक्यात महायुतीने बाजी मारली आहे. मात्र तालुक्यात दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. माजी जिल्हा परिषद अध्य्क्ष रोहन बने व रचना महाडिक तसेच ज्येष्ठ नेते सहदेव बेटकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

कुणबी फॅक्टर मुळे रत्नागिरीच्या राजकारणामध्ये दिग्गजांना विचार करण्याची वेळ..

संगमेश्वरच्या इलेक्शन मध्ये चार जिल्हा परिषद गटामध्ये एक नवीन पॅटर्न उदयास आला आहे. *कुणबी पॅटर्न* असे या नवीन पॅटर्न चे नाव आहे. या पॅटर्नचा फटका चार जिल्हा परिषद गटामध्ये बसल्याचे दिसून आले आहे. सर्वात मोठा फटका जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. रचना महाडिक यांना बसलेला असून पारंपारिक मतदार यांनी समाजासाठी मोठ्या नेत्यांकडे दिसून आले आहे. पक्ष कुठलाही असो समाजाचे हित कशामध्ये आहे आणि आपल्या समाजाचा उमेदवार कसा निवडून येईल त्याची वेळ रचना केली सहा ते सात महिन्यापासून चालू असल्याचे दिसून आले आहे. मुळे येणाऱ्या पुढील इलेक्शनमुळे हा पॅटर्न दिग्गज नेत्यांना  विचार करण्यास लावणार आहे.

राज्याचे लक्ष लागलेल्या कुसुम जिल्हा परिषद गटामध्ये प्रमोद अधटराव यांचा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये विजय…

जि. प. निवडणुकीत कोसुंब जि. प. गटात सर्वात हायहोल्टेज लढत झाली. याचे कारण या गटातून भाजपकडून प्रमोद अधटराव व शिवसेना शिंदे गटातून रोहन बने निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या गटात महायुतीमध्येच ही खऱ्याअर्थाने लढत झाली. या लढतीमध्ये भाजपच्या प्रमोद अधटराव यांनी रोहन बने यांचा पराभव केला. प्रमोद अधटराव यांनी सातत्यपूर्ण सदर जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसामान्य मतदारापर्यंत संपर्क ठेवल्यामुळे मोठा विजय त्यांना मिळवता आला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशामध्ये आपण निवडून येणार आणि त्यासंदर्भातले पूर्ण गणित मांडल्यामुळे त्यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा  निर्णय आज योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रमोद अधटराव यांचा आदर्श भारतीय जनता पार्टीतील जिल्ह्यातील लोकांनी घ्यायला हवा असे लोकांमध्ये चर्चा आहे. सदर निकालाची चर्चा राज्यभर करण्यात येत आहे. सदर निकालाकडे पूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष होते सदर इलेक्शन मध्ये प्रमोद आढळराव यांनी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये विजय मिळवला आहे.

पंचायत समिती निवडणुकीत धामापूर तर्फे संगमेश्वर- महेश जड्यार (भाजप), आरवली- प्रिया सुवरे (राष्ट्रवादी अजित पवार गट), कडवई- अपर्णा जाधव (शिवसेना ठाकरे गट), धामणी- दत्ताराम लाखण (शिवसेना ठाकरे गट), कसबा- सुरेश माईन (शिवसेना शिंदे गट), परचुरी- शर्वरी वेल्ये (शिवसेना शिंदे गट), माभळे- सुहास मायगडे (शिवसेना शिंदे गट), मुचरी- आरूषी घवाळी (राष्ट्रवादी अजित पवार गट), कोसुंब- दुर्वा पाष्टे (भाजप), निवेबुद्रुक- प्रफुल्ल बाईत (राष्ट्रवादी अजित पवार गट), साडवली- क्षमा जाधव (शिवसेना ठाकरे गट), हातीव- मंगेश बांडागळे (राष्ट्रवादी अजित पवार गट),दाभोळे- दिपाली जाधव (शिवसेना शिंदे गट), कोंडगाव- विद्यासागर तांदळे (शिवसेना ठाकरे गट) हे विजयी झाले आहेत.

तालुक्यातील ७ पैकी ४ जि. प. गटांवर शिवसेना शिंदे गट-भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जि. प. निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे. यामध्ये जि. प. निवडणुकीत धामापूर तर्फे संगमेश्वर- सुशिल भायजे (राष्ट्रवादी अजित पवार गट), कडवई- संतोष थेराडे (शिवसेना ठाकरे गट), कसबा- विशाखा कुवळेकर (शिवसेना ठाकरे गट), मुचरी- माधवी गीते (शिवसेना शिंदे गट), कोसुंब-प्रमोद अधटराव (भाजप), साडवली- नेहा माने (शिवसेना ठाकरे गट), दाभोळे- विलास चाळके (शिवसेना शिंदे गट) हे उमेदवार विजयी झाले आहेत. जि. प. निवडणुकीत कोसुंब जि. प. गटात सर्वात हायहोल्टेज लढत झाली. याचे कारण या गटातून भाजपकडून प्रमोद अधटराव व शिवसेना शिंदे गटातून रोहन बने निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या गटात महायुतीमध्येच ही खऱ्याअर्थाने लढत झाली. या लढतीमध्ये भाजपच्या प्रमोद अधटराव यांनी रोहन बने यांचा पराभव केला.

*कसबा जिल्हा परिषद गटामध्ये शिंदे सेनेला झटका..*

कसबा जि. प. गटातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सौ. विशाखा विजय कुवळेकर यांनी प्रभावी कामगिरी करत विजय मिळवला. उबाठा शिवसेनेच्या उमेदवार म्हणून त्यांनी पारंपरिक शिंदे सेनेला मोठा धक्का देत अनेक वर्षांपासून असलेली एकहाती सत्ता मोडीत काढली. नवख्या उमेदवाराने मिळवलेल्या या दणदणीत यशामुळे कसबा गटाच्या राजकीय समीकरणात मोठा बदल झाल्याचे चित्र आहे. विजय घोषित झाल्यानंतर सौ. कुवळेकर यांनी मतदार बांधव भगिनींचे आभार मानले. निवडणूक काळात दिलेले प्रत्येक आश्वासन सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करून दाखवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विकासकामांना प्राधान्य देत काम करताना कोणत्याही परिस्थितीत राजकारण केले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या विजयामुळे कसबा गटात नव्या नेतृत्वाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

दोन जिल्हा परिषद गटातील पराभवामुळे भारतीय जनता पार्टीला विचार मंथन करण्याची गरज

साडवली जिल्हा परिषद गट आणि कडवई जिल्हा परिषद गट मध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन उमेदवारांचा पराभव झालेला असून भारतीय जनता पार्टीला विचार करण्याची वेळ आली आहे. सदर जिल्हा परिषद गटामध्ये कडवी झुंज देऊ नये पराभव झाल्याने विचार मंथन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पार्टी मधील या वेळेला दोन जिल्हा परिषद गट देण्यात आले होते. सदर जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असून त्यामुळेच सदर जिल्हा परिषद गट मध्ये भारतीय जनता पार्टीला निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी मिळाली होती.  कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु नव्या पॅटर्नमुळे सदर गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्याचे दिसून येत आहे.

साडवली जि. प. गटातून शिवसेना ठाकरे गटाच्या नेहा माने यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या रूपाली कदम यांचा पराभव केला. रूपाली कदम या प्रथमच निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. कडवई जि. प. गटातून शिवसेना ठाकरे गटाचे संतोष थेराडे यांनी भाजपचे विनोद म्हस्के यांचा पराभव केला. या गटात कुणबी फँक्टर चालल्याचे बोलले जात आहे. मुचरी जि. प. गटात अटीतटीच्या लढतीत शिवसेना शिंदे सेनेच्या माधवी गिते यांनी विजय मिळवला आहे. या गटात माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या माधवी गिते या पूर्वी शिवसेना एकसंघ असताना कार्यरत होत्या. शिवसेना फुटीनंतर त्या शिंदे सेनेत गेल्या होत्या. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून ललिता तांबे या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच या दोघींमध्ये थेट लढत होणार असल्याचे चित्र होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वातावरण चांगलेच तापले होते. अखेर निकालाच्या दिवशी माधवी गिते यांनी बाजी मारली. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. धामापूर तर्फे संगमेश्वर जि. प. गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवखे उमेदवार सुशिल भायजे यांनी मातब्बर असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या सहदेव बेटकर यांचा दारूण पराभव केला. दाभोळे जि. प. गटातून शिवसेना शिंदे गटाचे विलास चाळके यांनी दणदणीत विजय मिळवला. ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार ठरले आहेत. त्यांनी वंचितच्या विरश्री बेटकर यांचा पराभव केला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page