मोबाईल गेममध्ये पराभव झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या…

Spread the love

रत्नागिरी | प्रतिनिधी: अहल्यानगर येथील नेवासा बुड्रुक येथून आपल्या मामाकडे राहण्यासाठी आलेल्या १७ वर्षीय युवकाने मोबाईलवर गेम हरल्याच्या कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मृत युवकाचे नाव रवींद्र राजेंद्र बेंद्रे (रा. नेवासा बुड्रुक, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे असून तो गेले काही दिवस नाणीज येथे आपल्या मामा विकास पोपट म्हसे यांच्या घरी राहत होता. तो कॉलेज शिक्षणासाठी येथे आलेला होता.

पोलीस सूत्रांनुसार, रवींद्रला मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी निदर्शनास आणले होते. २४ जून रोजी दुपारी ९ वाजण्याच्या सुमारास, आपल्या राहत्या खोलीत लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत तो आढळून आला.

नातेवाइकांनी तत्काळ त्याला खाली उतरवून ग्रामिण रुग्णालय, पातण येथे नेले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच नाणीज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूमागील अचूक कारण आणि अन्य बाबींची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मोबाईल गेमचे व्यसन आणि मानसिक स्वास्थ्य यावर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page