अखेर शास्त्री पुल येथील धोकादायक दरड कोसळली, चार घरांना धोका, राष्ट्रीय महामार्ग आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा हलगर्जीपणा नडला, बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होणार का?…

Spread the love

राष्ट्रीय महामार्गाचे चीप इंजिनियर पासून उपअभियंता यांचे आदेश कॉन्ट्रॅक्टर कडून धाब्यावर…

गणेश पवार /संगमेश्वर- मुंबई गोवा हायवे वरती संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री फुले येथे तीव्र वळणावरती मुंबई गोवा हायवे साठी सर्वे नंबर 72/2अ भूसंपादन करण्यात आलेली होती. सदर जमीन मधील घरे ही मुंबई गोवा हायवे पासून शंभर फुट उंचावर आहे. गेली वर्षभर सदर ठिकाणी संरक्षण भिंत बांधून मिळावी म्हणून संबंधित जमीन मालक व घरमालक राष्ट्रीय महामार्ग विभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केलेली होती. परंतु लेखी पत्राला कोणते उत्तर संबंधित डिपार्टमेंटच्या लोकांनी दिलेले नाही. कादर इस्माईल दळवी आणि त्यांचे नातेवाईक असे चार घरांमध्ये कुटुंब राहत होती. सदरची दरड कोसळल्याने आज चार कुटुंब उघड्यावरती आलेले आहेत. याला जबाबदार कोण हा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होणार की नाही हा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

शंभर फूट उंचावरील चार घरे आतील कुटुंबे झाली बेगर..

जमिनीमधून मुंबई गोवा हायवे चे भूसंपादन झाले आहे. मुंबई गोवा हायवे पासून घराची उंची 100 फूट पेक्षा जास्त आहे. सदर ठिकाणी संरक्षण भिंत बांधून मिळावे म्हणून गेली वर्षभर संबंधित कुटुंब पाठपुरावा करत आहोत. भिंत घालून देतो असे सांगण्यात आले परंतु कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दिलेल्या कुठल्या पत्राला राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेली नाही. एक वर्षांपूर्वी पासून राष्ट्रीय महामार्ग यांनी तोंडी आश्वासनाने सदर ठिकाणी संरक्षण भिंत घालून देतो असे सांगण्यात आलेले होते. परंतु 100 फूट उंचावर राहणाऱ्या लोकांचा विचार कोणीही केलेला नाही. लोकांच्या जीवाला धोका असूनही आज पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आज रोजी चार घरातील कुटुंबी बिगर झालेली आहेत. बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टच्या सदरची घटना घडलेली आहे.

या अगोदर झालेल्या अपघाताची दखल न घेता भिंत घालण्यास केली टाळाटाळ आमदारांचे आदेशालाही केराची टोपली

शास्त्री पुल येथील सदर ठिकाणी सुलेमान अब्बास खान यांचे राहते घर 26 एप्रिल 2024 रोजी मातीसह खाली रस्त्यावरती आले होते. त्यावेळेला रिक्षाचा अपघात होऊन रिक्षाचे नुकसान झाले होते. पोलीस निरीक्षक पारवे साहेब सदर ठिकाणी उपस्थित राहून अपघात झालेल्या सर्वांना मदत केली होती. सदर वेळेला सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनियर कौशिक रहाटे, चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम, राजेंद्र महाडिक आणि कसबा पंचक्रोशीतील लोक उपस्थित होते. सदर वेळेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 टप्पा क्रमांक सहा सब कॉन्ट्रॅक्टर जे एम म्हात्रे कंपनी चे जनरल मॅनेजर हलशेठ यांनी या सर्वांच्या समोर दहा ते बारा दिवस आत मध्ये संरक्षण भिंत घालून देतो असे आश्वासन दिले होते असे आम्हाला सांगितले होते. त्यानंतर भिंतीचे काम कुठे दवाखान्याच्या इकडून सरकारी दवाखान्याच्या बाजूने चालू करण्यात आली. त्यानंतर वातावरण निवडल्यानंतर काम बंद करण्यात आले. आमदार पालकमंत्री यांनी सदर ठिकाणी तात्काळ भिंत घालावी असे आदेश देण्यात आलेले होते परंतु कॉन्ट्रॅक्टर चे मॅनेजर अलशेठ याच्या मजूर व हट्टी स्वभावामुळे आजची परिस्थिती ओढवली आहे.

तहसीलदार राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस प्रशासनाने सांगूनही कॉन्ट्रॅक्टर ने काम करण्यास केली टाळाटाळ…

त्यानंतर पाठपुरावा करूनही पुढील संरक्षण निमित्त बांधत नसल्याने आणि अचानक वीस मेला पाऊस चालू झाल्याने रस्ता वाहून गेलेला असताना तहसीलदार अमृता साबळे राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता कुलकर्णी साहेब, कौशिक रहाटे, पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे साहेब हे उपस्थित होते. सदर वेळेला कोणत्याही परिस्थितीत आठ दिवसांमध्ये संरक्षण भिंत घालून देतो असे आश्वासन तहसीलदार अमृता साबळे यांच्यासमोर कुलकर्णी साहेब व हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरने दिले.  पाऊस कमी झाल्यानंतर भिंतीसाठी चे सामान आणले परंतु अगदी दिम्या गतीने काम करण्यात आले. तरी संरक्षण भिंतीचे काम करण्यात आलेले नाहीत. देऊन दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊ नये कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे निष्काळाची पणे काम करणे, चार घरातील लोकांच्या जीवाशी खेळणे, त्यांना मानसिक त्रास देणे, बेजबाबदारपणे वागणे, तसेच आमच्या चार कुटुंबाची फसवणूक करणे या विषयाला धरून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर मुळे राष्ट्रीय महामार्गाचे करोडो  नुकसान झाले आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीचा फटका सर्वसामान्य नागरिकांवर न बसता ट्रॅक्टरच्या बिलामधून सदरचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कॉन्ट्रॅक्टर विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

दिनांक 16 रोजी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास घडली घटना…

आमच्या प्रतिनिधींनी जागेवर जाऊन घेतलेली माहिती सविस्तर पुढील प्रमाणे आहे ,दिनांक  16/ 6/ 2025 सकाळी 11 वाजता घराच्या पुढील बाजूस जमिनीला भेगा गेल्या होत्या. तलाठी कसबा सरपंच आणि ग्रामसेवक यांना फोनवरून सदर घटनेची कल्पना दिली. सदर ठिकाणी तीन वाजता सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील सह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हजर जाऊन पंचनामा घातला व आमच्या कुटुंबाला सहकार्य केले. सदर ठिकाणी संध्याकाळी संध्याकाळी 6: 45 वाजता भेगा पडलेल्या जमिनीसहित पूर्ण माती मुंबई गोवा हायवे वरती गेली. सुदैवाने सदर ठिकाणी कोणत्या वाहन नसल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. आज पर्यंत माती तीन वेळा खाली आली एकदा रिक्षेचा अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे लोकांच्या जीवित अशी खेळल्यामुळे बेजबाबदारपणे वागल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर व संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

जे एम म्हात्रे कंट्रक्शन कंपनी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत स्थानिक नागरिकांची मागणी…

जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनीचे हलशेठ ,कैस मालगुंडकर, प्रफुल देसाई, जे एम म्हात्रे कंट्रक्शन कंपनीचे सेफ्टी ऑफिसर, राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनिअर, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता, जे मात्र कंट्रक्शन कंपनीचे जबाबदार अधिकारी आणि मालक यांच्याविरुद्ध योग्य ती चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी. अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्यासमोर रात्री साडेनऊच्या सुमारास भेट घेऊन केली आहे. लेखी निवेदनाची मागणी केली आहे स्वतः चौकशी करतो असे त्यांनी यावेळी संबंधित ग्रामस्थ व कुटुंबाला आश्वासन दिले आहे.

पालकमंत्री यांच्या जनता दरबार मध्ये केलेल्या तक्रारीला केराची टोपली..

ग्रामपंचायत कार्यालयाकडून राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी  व उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे कसबात जाण्यासाठी रस्ता व संबंधित घरांना संरक्षण भिंत घालून देण्याचे पत्र देण्यात आलेले होते. युसुफ कावनकर यांनीही रस्ता संरक्षण भिंत व कचव्यात जाण्यासाठी रस्ता करण्यासाठी पत्र दिलेले आहे. ग्रामपंचायत सदस्य इलाज मापारी यांनीही पत्रव्यवहार केलेला आहे. संपूर्ण कसबा गावाने पाठपुरावा करू नही राष्ट्रीय महामार्गाने कोणतीही कारवाई केली नाही.तसेच पालकमंत्री यांच्या जनता दरबार मध्ये ग्रामपंचायत सदस्य इलाज मापारी आणि शेजारील घरमालक युसुफ कावनकर यांनीही पत्रव्यवहार केला होता. पालकमंत्र्यांच्या जनता दरबार मध्ये कुलकर्णी साहेब यांनी पुढील आठ दिवसांमध्ये संरक्षण भिंत व कचऱ्यात जाणारा रस्ता करून देतो. तसेच संबंधित घरापर्यंत जाण्याचा रस्ता करून देतो असे पालकमंत्र्यांना आश्वासन दिले होते. परंतु पालकमंत्र्यांचा जनता दरबार होऊन दीड महिन्याचा कालावधी होऊ नये आजपर्यंत संरक्षण भिंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे प्रशासन व कॉन्ट्रॅक्टर बेजबाबदार आहे हे सिद्ध होते त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर व राष्ट्रीय महामार्ग चे अधिकारी यांच्यावर बेजबाबदारपणे वागणे, लोकांच्या जीवाशी खेळणे, तसेच फसवणूक करणे आणि दिशाभूल करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. अशी स्थानिक ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने मागणी केली आहे. यावेळी बोलताना ग्रामपंचायती सदस्य इलाज मापारी यांनी सदरची मागणी केली आहे.

पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचे काम कौतुकास्पद…

सदरची घटना घडल्यानंतर त्वरित संगमेश्वर पोलीस स्टेशन येथून सदर ठिकाणी स्वतः पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण हे हजर होऊन घटनेची पाहणी केली. ग्रामस्थ यांच्या मदतीने रस्ता बंद केला. घरातील लोकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना घर सोडून दुसऱ्या घरामध्ये स्थलांतर करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी स्वतः कलेक्टर राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली व सदर घटनेची पूर्ण डिटेल माहिती संबंधित प्रशासनाला दिली. यावेळी योग्य ती कारवाई करतो असे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. सदर घटनेची पोलिसांनी दाखवलेले सहकारी हे अनमोल असून त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले स्थलांतर करून दुसरीकडे राहायला गेले आहेत. कसब्यातील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या आभार मानले आहेत. घटनास्थळावर रात्री अकरा वाजेपर्यंत जनशक्तीच्या दबाव चे प्रतिनिधी उपस्थित होते. लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल संबंधित कुटुंबांनी नागरिकांच्या आभार मानले आहे.

कारवाई होणार का आज नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम…

मुंबई गोवा हायवे वरती संगमेश्वर शास्त्री फुल ते गणेश कृपा हॉटेल म्हाबळे दरम्यान आजपर्यंत अनेक अडचणी आलेले आहेत. त्यातील महत्त्वाच्या घटना-

▪️एसटी स्टँड समोर होणारे ट्रॅफिक हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वस्वी जबाबदार कॉन्ट्रॅक्टर असल्याचे नागरिकांकडून म्हणण्यात येत आहे.

▪️तसेच शास्त्री फुल येथील घडलेली घटना ही बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर मुळे घडलेली आहे….

▪️पैसा फंड हायस्कूल समोरील रस्त्या चे काम अर्धवट नागरिकांना चिखलातून प्रवासŵpĺ ….

▪️वांद्री येथील रस्त्याच्या व बायपास रोडवर असल्यामुळे लोकांना खड्ड्यांचा त्रास…

▪️कोळंबे येथील रस्त्यावर असलेले खड्डे….

▪️रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे गेले असून ते फोडून दुरुस्त करण्यात कॉन्ट्रॅक्टर अपयशी…

आज सर्व नागरिकांचे लक्ष कॉन्ट्रॅक्टर वर वर कर काय होते. याकडे लागून राहिलेले आहे. कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार असं करण्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या बेजबाबदारपणामुळे आज अनेक नागरिकांचे जीव गेलेले असून कोणती कारवाई आजपर्यंत कॉन्ट्रॅक्टर वर झालेली नाही अनेक आंदोलना अनेक उपोषण अनेक मोर्चे काढूनही 13 ते 14 वर्ष रस्त्याला होतात ही खेदजनक बाब आहे. लोकांना विचार करायला लावणारी घटना आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page