महामार्गावर वृक्ष लागवड कधी,?रस्त्याच्या मध्यभागी माती टाकण्याचे काम गेले अनेक दिवस सुरूच!…

Spread the love

दीपक भोसले/संगमेश्वर – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करण्यासाठी वृक्षतोड मोहीम जोरात हातात घेण्यात आले मात्र चौपदरीकरण झालेल्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी माती टाकण्याचे काम गेले अनेक दिवस सुरूच असून टाकलेली माती रस्त्याच्या बाहेर आली तरी अनेक दिवस झाडे लावण्याचे काम रखडलेलेच आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेले अनेक दिवस रखडले आहे. रखडलेल्या चौपदरीकरणाचा फटका चाकरमानी तसेच स्थानिक ग्रामस्थांना बसत आहे. संगमेश्वर पट्ट्यामध्ये सर्वाधिक चौपदरीकरणाचे काम रखडले असून रखडत सुरू असलेल्या कामांमुळे येथील व्यापाराला  फटका बसला आहे. शिमगोत्सव सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाला आले आहेत गावोगावी पालखी भेटीचा कार्यक्रम सुरू असून हजारो भक्त गण दर्शन घेत आहेत. चौपदरीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात महामार्गावरील झाडे तोडण्यात आली आहेत.

काही ठिकाणी तर विनापरवाना झाडे तोडण्यात आली . हजारो पक्षांचे निवासस्थाने नष्ट झाले असून पक्षी बेघर झाले आहेत रखडलेल्या चौपदरी करण्याचे
काम संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी तर दिशादर्शक नसलेले फलक तर काही ठिकाणी धोकादायक दरडी आहेत .संगमेश्वर पुनर्वसन ते ओझरखोल पर्यत एक मार्ग वाहतूक करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिक तसेच स्थानिक व्यावसायिक यांचे मोठे नुकसान होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page