भारतीय बौद्ध महासभेचे माजी सल्लागार रामचंद्र कदम यांचे निधन

Spread the love

गणपतीपुळे- रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी समतानगर येथील भारतीय बौद्ध महासभा गावशाखेचे माजी सल्लागार तथा माजी कोषाध्यक्ष रामचंद्र पांडुरंग कदम यांचे शनिवारी दिर्घ आजाराने निधन झाले.
ते ७५ वर्षांचे होते. वरची निवेंडी गावचे पोलीस पाटील दिवाकर कदम यांचे ते सख्ये चुलते ( काका) होत.

रामचंद्र कदम यांनी आपल्या आयुष्यात महावितरण कंपनीच्या अंतर्गत ठेकेदार म्हणून सुमारे २५ ते ३० वर्षे काम करताना विद्युत जोडणीशी संबंधित कामे अतिशय उत्तम प्रकारे करीत आपला ठसा उमटवला होता.
या कामांमध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे अनेकांनी पाहिले होते. अतिशय मनमिळावू, प्रेमळ व हसतमुख असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या आयुष्यात माणसे जोडण्याचे खूप मोठे माणुसकीचे काम केले. तसेच आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचे काम आयुष्यभर केले.

त्यामुळे आजही त्यांचे कुटुंब एकोप्याने व गुण्या गोविंदाने नांदत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांचे सर्व नातेवाईक , मित्रमंडळी व ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने अंत्ययात्रेला उपस्थित होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, बहिण, पुतणे, पुतण्या व अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे.त्यांचा जलदानविधी तथा पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा गावशाखा निवेंडी समतानगर यांचे वतीने करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page