.रत्नागिरी शहरात “पाणी बाणी”…, शिळ धरणावरील जॅक वेल कोसळली..

Spread the love

रत्नागिरी:- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील जॅक वेल कोसळली आहे. सुदैवाने ही जॅक वेल कोसळताना कामगारांनी बाहेर उड्या टाकल्याने ते बचावले आहेत. मात्र आता नवीन जॅक वेल चालू करण्यासाठी सुमारे १५ ते २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

यावर उपाय म्हणून पानवलं धरणातून व एम आय डी सी कडून पाणी घेऊन त्याचा पुरवठा शहराला केला जाणार आहे. उद्या दुपारपर्यंत शहराला पाणी देण्याचे प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी तुशार बाबर यांनी सांगितले आहे.

आज पहाटे जॅक वेल कोसळताच माजी नगरसेवक निमेश नायर आणी नगर पालिका अधिकारी आणी कर्मचाऱ्यांनी शिळ धरणाकडे धाव घेतली. सध्या नवी जॅक वेल बांधून पूर्ण झाली आहे. ही नवी जॅक वेल जरी जलद गतीने सुरु करायची म्हटली तरी १५ ते २० दिवसांचा अवधी लागू शकतो.

यातून काही मार्ग निघतो का? यावर विचार चालू आहे. सर्व नागरिकांना ज्या माध्यमातून पाणी मिळेल त्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन करण्यात आलं आहे.

▶️आज दूपारनंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार?

आज पहाटे शिळ धरणातील जॅकवेल कोसळल्याची माहिती माजी नगरसेवक निमेश नायर यांनी देताच सर्वत्र चिंता व्यक्त होऊ लागली. जॅकवेल उभारण्यासाठी सुमारे १५ दिवसांचा कालावधी आवश्यक होता.

याबाबतची माहिती तत्काळ रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत याना देण्यात आली. सुरु असलेला गणेशोत्सव लक्षात घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पहाटे ५ वाजता एमआयडीसी सीईओ बिपीन शर्मा यांना सूचना दिल्या व रत्नागिरी शहराला रोज १० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला

या तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे आज दुपारनंतर रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page