
रत्नागिरी l 19 जुलै-
राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदाची धुरा बाबाजी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना दिले.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी काही दिवस वेट ऍण्ड वॉच’ ची भूमिका घेतली होती. यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या त्यांच्या भूमिकेकडे नजरा खिळल्या होत्या. मुंबई येथे झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीदरम्यान बाबाजी जाधव यांनी उपस्थिती दर्शवत अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून कार्यकर्ते अजूनही संभ्रमावस्थेत आहेत.
राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांच्या झालेल्या नियुक्तीनंतर नेमके कोणत्या गटात सामील व्हायचे? असा पेच कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला असला तरी बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार गटातच सामील होण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसातच जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याची शक्यता आहे.