अंमली पदार्थांची विक्री करणारे चौघे
जेरबंद, ३ लाख ४० हजाराचा माल जप्त

Spread the love

संगमेश्वर :- चोरट्या पध्दतीने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या चौघांच्या संगमेश्वर पोलिसांनी सोमवारी रात्री मुसक्या आवळल्या. संगमेश्वर पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये कसबा शास्त्रीपूल येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा शास्त्रीपूल येथे चरसची विक्री होणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेश गावीत यांनी कसबा शास्त्रीपूल येथे सापळा रचून ४ आरोपींना मुद्देमालासह रंगेहात पकडले. अजय राजेंद्र काणेकर (वय-३८), अक्षरा अजय काणेकर (३६, दोघे रा. असगोली, मधलीवाडी, ता. गुहागर), मुस्ताक इब्राहिम मुल्लाजी (५६, रा. कसबा शास्त्रीपूल ता. संगमेश्वर), कामील हसन मुल्ला (४८, रा. डिंगणी, मोहल्ला ता. संगमेश्वर) अशी चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३,००,०००/- किमतीचा चरस जप्त करण्यात आला. या कारवाईत ४० हजारांची दुचाकीही जप्त केली आहे. या चौघांवर संगमेश्वर पोलिस स्थानकात अंमली औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) सह २० (ब), (ii) (अ), २२ (ब), भारतीय दंड विधान कायदा ३४ अन्वये दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page