अजित पवारांना पहिल्यांदा कुणी
निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे
लक्ष देण्याची गरज नाही : शरद पवार

Spread the love

सोलापूर :- अजित पवारांना पहिल्यांदा कुणी तिकीट दिलं, त्यांना कुणी निवडून आणलं, असा सवाल करीत अजित पवार सध्या काहीही बोलत आहेत. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयाेजित कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अजित पवार हे शरद पवारांच्या वयाबद्दल वारंवार बोलत असून तरुणांना संधी मिळत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारल्यानंतर ‘अजित पवार काहीही बोलतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे’ त्यांनी सांगितले. केंद्र सरकार ईडीचा वापर हत्यार म्हणून करीत आहे. सरकार ईडीच्या माध्यमातून दशहत निर्माण करीत आहे, अशी टीका देखील या वेळी शरद पवार यांनी केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page