
रत्नागिरी: सुट्टी हंगामानिमित्त गावच्या दिशेने येत असलेल्या चाकरमान्यांना सीएनजीच्या तुटवड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून विशेष म्हणजे सीएनजी सुरु कधी होणार, हे खुद्द तेथील कर्मचाऱ्यांनाही माहिती नसल्याने परिणामी या रांगामध्ये आणखीनच वाढ होत आहे. दरम्यान, रत्नागिरीमध्येही सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा दिसत होत्या.मे महिन्याच्या सुट्टीच्या हंगामामध्ये मुंबई, पुणे येथील चाकरमानी गावच्या दिशेने येत असतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. एकीकडे चाकरमानी कोकणात आले असताना दुसरीकडे त्यांना वाहनामध्ये सीएनजी भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सीएनजीच्या वाढत्या मागणीमुळे सीएनजी काही दिवसातच संपत असल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. शनिवारीदेखील यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. चाकरमानी सीएनजी भरण्यासाठी आले असताना संपलेल्या सीएनजीमुळे त्यांना बराच वेळ रांगेत उभे रहावे लागले. यामुळे शहरातील शिवाजीनगर बसस्थानकापासून त्यापुढे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.रत्नागिरीतही सीएनजी पंपांवर रांगा लागल्या होत्या.
रत्नागिरीतही सीएनजी पंपांवर रांगा…
जिल्हाभरात सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सीएनजी पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. येथील रिक्षाचालक, स्थानिक चारचाकी वाहनधारक, पर्यटक, चाकरमानी अशा सर्वांनाच याचा मोठा फटका बसला असून सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. तर त्यावरून पंपावर शुक्रवारी रात्री रत्नागिरीत स्थानिक रिक्षाधारकांनी संतापही व्यक्त केला.जिह्यात पंपांवर सीएनजी तुटवड्याची गेल्या 10 दिवसांपासून जिह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. उन्हाळी सुट्टीत गावाकडे येणाऱ्या चाकरमानी तसेच पर्यटनासाठी जिह्यात येणाऱ्या पर्यटकांनाही या सीएनजीचा सामना करावा लागत आहे.ज्यांच्या गाड्या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत, त्यांना पहाटेपासूनच तासन् तास गॅस भरण्यासाठी रांगामध्ये उभे रहावे लागत आहे. या सर्व वाहनधारकांचा प्रचंड वेळ वाया जात आहे. सर्वच पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. यामुळे 4 ते 5 तास गॅस मिळवायला वेळ लागत असल्याच्या स्थितीने सारेच हैराण झाले आहेत.
पर्यटक व रिक्षा चालक हैराण महानगर गॅस वर कारवाई करण्याची मागणी….
रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पंपावर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. याचा सर्वात फटका जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्या सीएनजीच्या वाहनांना बसत आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकही हैराण झाले आहेत. ‘आम्ही फिरायचं कधी आणि गॅस कधी भरायचा’, असा सवाल पर्यटकांनी तर ‘साहेब तुम्हीच सांगा आता आम्ही कसं जगायच…. असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे. सदर बाबी गंभीर असून प्रशासनाने योग्य दखल जाऊन महानगर गॅसवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. लवकरच या संदर्भाचे पत्र पेट्रोलियम मंत्राला देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितलेले आहे.
दहा दिवसापासून परिस्थिती गंभीर, मे महिना व सुट्टीच्या वेळेला परिस्थिती गंभीर…
जिल्ह्यात सर्वच पंपांवर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यातील परिस्थिथी गंभीर बनली आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत आहे. उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी जिल्ह्यात येणार्या पर्यटकांनासुद्धा या सीएनजीचा सामना करावा लागत आहे. ज्या पर्यटकांच्या गाड्या सीएनजीवर चालणार्या आहेत. त्यांना तासनतास गॅस भरण्यासाठी रांगामध्ये उभे रहवे लागत आहे. यातच त्यांचा वेळ जात आहे. साधारण जिल्ह्यात सर्वच पंपावर किमान २ ते ३ कि.मी. पर्यंत लांबचलांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. यामुळे ४ ते ५ तास गॅस मिळवायला वेळ लागत आहे. काही वेळा नंबर येतो मात्र गॅसच संपतो, अशाही प्रसंगाला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे सध्या सर्वच वाहनचालक हैराण झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंप नगण्य व महानगर गॅस चा पुरवठाही अपुरा…
वाढत्या पेट्रोलला पर्याय म्हणून अनेकजण सीएनजी पर्याय देत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सीएनजी वाहनांची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण असे असले तरीही जिल्ह्यात अजूनही मुबलक सीएनजी पंप उपलब्ध होऊ न शकल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात रत्नागिरी व चिपळूण या मोठ्या शहरात दोनच पंप आहेत. तर शहरालगत १ पंप आहे. खेडमध्ये २, संगमेश्वरमध्ये ३, लांजात १, राजापूरला १ असे पंप आहेत.