कोविड काळात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पालिकेवर मोर्चा; ठा.म.पा. अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित

Spread the love

ठाणे : निलेश घाग ठाणे महापालिकेत कोविड काळात रुजू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान, सेवेत कायम करणे आणि विविध रजा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी काम बंद आंदोलन केले. या कर्मचाऱ्यांनी ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

ठाणे महापालिकेने करोना काळात रुग्ण उपचारासाठी रुग्णालये उभारली होती. याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात कर्मचाऱ्यांची नेमणुक केली होती. कोविड काळात हे कर्मचारी पालिका सेवेत अद्याप कायम आहेत. केलेल्या कामाचा विचार करून त्यांना सेवेत कायम ठेवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ७०० हून अधिक आहे. या कर्मचाऱ्यांना पालिकेकडून मानधन देण्यात येत आहे.

ठाणे महापालिकेने आस्थापनेवरील तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहिर केले आहे. परंतु ठोक मानधनावर असलेल्या या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर केलेले नाही.

सानुग्रह अनुदान देण्याबरोबरच पालिका सेवेत कायम करणे आणि विविध रजा देणे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. तसेच पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. यादरम्यान, कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका उपायुक्त उमेश बिरारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ठोक मान-धनावरील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देत येत नसल्याचे स्पष्ट करत विविध रजे बाबत मात्र सकारात्मक विचार करू असे आश्वासन बिरारी यांनी शिष्ट मंडळाला दिले. यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलन काळात पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था केल्याने आरोग्य सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा पालिकेने म्हटले आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page