
गणेश पवार /संगमेश्वर प्रतिनिधी- संगमेश्वर नावडी बाजार पेठ मध्ये सध्या चिखलाच्या साम्राज्य झाले आहे. गेली मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसा वेळेला संगमेश्वर मार्केटमध्ये हवेची माती वाहून येऊन चिखल झाला होता. त्यावेळेला स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगून उपाययोजना करण्याचे सांगितले होते. तरीही गेली महिनाभराचा कालावधी होऊ नये ती उपाययोजना कॉन्ट्रॅक्टरने केलेली नाही. काल रात्री पडलेल्या पावसामुळे परत संगमेश्वर मार्केट मधील मेडिकल ते एसटी स्टँड कडे जाणारा मधला रस्ता वरती प्रचंड चिखल साठला आहे. कॉन्ट्रॅक्टर ने कोणतीही कारवाई न केल्याने सदरची वेळ व्यापाऱ्यांवर आली.

मे महिन्यापासून कॉन्ट्रॅक्टर झोपला आहे का?
मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या वेळेला कुलकर्णी यांना यांना व्यापाऱ्यांनी याची कल्पना दिली होती. त्या पद्धतीने कुलकर्णी यांनी कॉन्ट्रॅक्टर जे एम म्हात्रे यांना याची कल्पना देऊन उपाययोजना करण्याचे सांगितले होते. दोन दिवसापूर्वीच चीप इंजिनियर शेलार साहेब यांनी सदर मुंबई गोवा हायवे चा दौरा केला होता. त्यावेळेला हुजूर कंपनीचे व्यवस्थापक कदम आणि सब कॉन्ट्रॅक्टर जे एम म्हात्रे यांचे व्यवस्थापक मॅनेजर अलशेठ यांना स्पष्ट सूचना दिलेल्या होता. परंतु कोणतीही उपाययोजना कॉन्ट्रॅक्टरने केलेली नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांना फाट्यावर मारत असल्याचे दिसून येत आहे. कॉन्ट्रॅक्टरचा मनमानी कारभार चालू असून त्याचे कर्मचारीही उद्धटपणा करतात. “सरकारी काम आणि बारा महिने थांब!” या पद्धतीचे वक्तव्य त्यांचे खालील मॅनेजर करतात. याची कल्पना कुलकर्णी यांना दिली असता त्यांनीही आपली हतबलता बोलून दाखवली. महाराष्ट्राचे प्रमुख चीफ इंजिनियर शेलार साहेब यांचे कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसेल तर कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या जीवावर उड्या मारतोय हेही बघणे गरजेचे आहे.

पालकमंत्री यांच्या मतदारसंघांमध्ये अशी अवस्था असेल सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जनता दरबार सभेमध्ये सदर विषयावरती प्रश्न उपस्थित झाले होते. हायवे संदर्भामध्ये अनेक पत्र कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात देण्यात आलेली होती. त्यातील शास्त्री फुल येतील तक्रारी पालकमंत्र्यांनी नॅशनल हायवे ला धारेवर धरले होते. त्वरित काम करून रस्ता करून देण्याचे सांगण्यात आलेले होते. संपादनात संदर्भातही त्वरित निर्णय घेण्याचे सांगण्यात आलेले होते. तरीही कॉन्ट्रॅक्टरने आज पर्यंत साधा लोकांना जाण्यासाठी रस्ता करून कसबा येथे दिलेला नाही यावरून कॉन्ट्रॅक्टर किती मुजूर आहे हे दिसून येते. भूसंपादनात संदर्भातील अनेक तक्रारी व लोकांचे पेमेंट ही आजपर्यंत देण्यात आलेले नाही. नागरिकांची सनद लागू असताना अर्ज प्रलंबित कसे राहतात हाही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

नागरिकांच्या इमारती खाली करून घेऊ नये रोडचे काम अपूर्ण…
संगमेश्वर येथे बायपास रोड बनवण्यात आला आहे त्याच्यासाठी लागणारे घर पेमेंट न देता तोडून घेण्यात आले. परंतु आज रस्ता अपूर्ण ठेवण्यात आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी पोलीस प्रोटेक्शन घेऊन सदर इमारत मालकाकडून तोडून घेतली रस्ता पूर्ण करून का घेतला नाही याचेही कारण राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्थानिक कर्मचाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. लोकांना दादागिरी करायची मग कॉन्ट्रॅक्टर वर काम करण्यासाठी तीच दादागिरी का वापरत नाहीत हा प्रश्न येथे उपस्थित होतो. मुंबई गोवा हायवे च्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालणारे स्थानिक कर्मचारी म्हणूनच संगमेश्वर मधील ट्रॅफिक जाम होत आहे सर्वस्वी जबाबदार राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनियर यांची आहे यांच्यावर कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणी आहे.

ग्रामपंचायत इकडून कॉन्ट्रॅक्टर ला सांगूनही काम नाही.
संगमेश्वर चे उपसरपंच व ग्रामपंचायत तिने सूचना देऊनही कॉन्ट्रॅक्टर ने कोणतीही कारवाई केलेली नाही. उपसरपंचांच्या समोर ग्रामस्थांना पाईप आणून गटाची व्यवस्था करतो असे सांगण्यात आलेले होते परंतु कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अशा मजूर कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे. कॉन्ट्रॅक्टरची माणसे फोने उचलत नाहीत. नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे देतात. कॉन्ट्रॅक्टर प्रमाणेच चे कर्मचारी वागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. सदर रस्त्याचे इंजिनियर राष्ट्रीय महामार्गाचे रहाटे हे असून हे सर्व कामे त्यांनी करून घेणे अपेक्षित आहेत. परंतु त्यांचा सदर कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांनी त्यांना सांगू नये त्यांनीही कामे करून घेतली नाहीत. हे स्पष्ट दिसून येत आहे कर्मचाऱ्यांनी योग्य काम केले असते तर आज ही वेळ व्यापाऱ्यांवर आली नसती. स्थानिक कर्मचारी असूनही आपल्या बाजारपेठे मधील रस्त्यावरती चिखल होईल हे समजू नये हे संगमेश्वर वाशी यांचे दुर्दैव आहे.
पारवे साहेबांची बदली झाल्यानंतर बायपास रोडचे काम रखडले…
बायपास रोड बनवताना ट्रॅफिकचे कारण देण्यात आले. पोलीस निरीक्षक पारवे साहेब यांनी जातीनिशी लक्ष टाकून त्यांच्यासाठी प्रयत्न केले. पारवे साहेबांची बदली झाल्यानंतर सदर रस्त्याचे काम तिथेच पडून राहिले. रस्ता ही अपूर्ण आणि स्थानिकांचे हाल झाले आहेत. ज्याने प्रामाणिकपणा काम केले पाहिजे तेच कॉन्ट्रॅक्टर चे गुलाम झाले आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर चे मनोबल वाढले आहे असे स्थानिक लोकांच्या चर्चेमध्ये आहे. उपविभागीय अधिकारी रत्नागिरी व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना देऊ नये कॉन्ट्रॅक्टर काम करत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

बायपास रोड मुळे कडेल कडेला असलेल्या व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान…
बायपास रोड मुळे गेली तीन महिने व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. बायपास रोड खाली केल्यामुळे व्यापाऱ्यांना कोणतीही कल्पना न दिल्याने आणि त्यांच्यासाठी रस्ता व सुरक्षेची कोणतीही व्यवस्था कॉन्ट्रॅक्टर किंवा राष्ट्रीय महामार्ग विभागाने केलेली नाही. गेले तीन महिने दुकानाला संरक्षण भिंत बांधून मिळावी आणि रस्ता करून मिळावा याच्यासाठी तेथील स्थानिक व्यापारी यांनी कुलकर्णी साहेब कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे मागणी केली परंतु आजपर्यंत कोणतीही व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. कुलकर्णी साहेब गेली पंधरा दिवस सदर ठिकाणी खडी टाकून रोलर फिरवण्याची कॉन्ट्रॅक्टरला आदेश दिलेले आहेत परंतु कॉन्ट्रॅक्टर कोणतेही काम करत नाही त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. धान्याचे दुकान, जिल्हा मध्यवर्ती बँक, कॉम्प्युटर क्लासेस, दवाखाना आणि शासकीय गोडावन सदर ठिकाणी आहे. तर ठिकाणी खडी टाकून किंवा फ्लेवर ब्लॉक लावून देतो. संरक्षण भिंत घालून देतो असे कुलकर्णी साहेब यांनी मान्य केले होते. तहसीलदार संगमेश्वर निरीक्षक संगमेश्वर कुलकर्णी साहेब त्यांनी संयुक्त दौरा केला होता त्यावेळी ही कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या होत्या परंतु कॉन्ट्रॅक्टर करून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आदेश कॉन्ट्रॅक्टर जुमानत नाही. हे यातून दिसून येत आहे. पालकमंत्र्यांनी सदर विषयात लक्ष घालून त्वरित कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करावी असे त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांची मागणी आहे.
गटाराची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरील पाणी बाजारपेठेत…
संगमेश्वर बाजारपेठेत बायपास रस्ता चे बांधकाम करण्यात आले त्यासाठी संरक्षण भिंत घालण्यात आली परंतु सदर रस्त्याला गटाराची व्यवस्था कॉन्टॅक्ट करणे केली नाही. मुळे पूर्ण चिखल बाजारपेठेमध्ये येतो. कॉन्ट्रॅक्टरला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना देऊ नये. व्यापाऱ्यांनी सांगूनही आज पर्यंत उपाययोजना न केल्याने परत बाजारपेठेमध्ये चिखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण साहेब यांनी सदर गोष्टींमध्ये लक्ष घालून त्वरित उपाय योजना कॉन्ट्रॅक्टरला सांगाव्यात. कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

कसबा येथील लोकांना आम सभेमध्ये दिलेल्या पत्रावरती कारवाई नाहीच…
पालकमंत्री यांच्या जनता दरबार मध्ये कसबा ग्रामपंचायत सदस्य मापारी आणि स्थानिक नागरिकांनी निवेदन दिली होती परंतु कोणतीही कारवाई कॉन्ट्रॅक्टर करून करण्यात आलेली नव्हती. राष्ट्रीय महामार्गाला त्यावेळी पालकमंत्र्यांनी धारेवर धरले होते. पुढील आठ दिवसांमध्ये रस्ता करून देतो व संरक्षण भिंत घालून देतो असे कुलकर्णी साहेब यांनी सदर जनता दरबार मध्ये कबूल केले होते. त्यानंतर आठ दिवसांमध्ये सदर ठिकाणी काम केलेच नाही परंतु शास्त्री पूल येथील दरड कोसळून परीक्षेचा अपघात झाला. त्यावेळी रास्ता रोको ही करण्यात आलेला होता. सदर ठिकाणी भिंत त्वरित घालतो असे सांगून आज पर्यंत भिंतीचे काम पूर्ण झालेले नाही. तेथील स्थानिक लोकांच्या गाड्या वरती अडकलेले असून साधे चालण्यासाठी ही रस्ता उपलब्ध नाही. सदर रस्त्यावर खडी टाकून देतो असे सांगू नये आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सदरच्या नागरिकांच्या हाल झालेल्या असून जीव मुठीत घेऊन तेथील लोक रस्त्यावर उतरत आहेत. याची दखल पालकमंत्र्यांनी घ्यावी अशी तेथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.